Tuesday, 9 May 2017

नराधम

स्पर्धेसाठी

          विद्रोही कविता

             नराधम

  कोण म्हणत आम्ही,
      आहोत सुरक्षित ?

माझ्याच दारात आता ,
झाले मी असुरक्षित .

वयाचही भान नाही ,
या वासनांध नजरेला .

अंत ना ऊरला आता ,
    या पाशवीपनाला .

असता जिवंत आता ,
  शिवबा तो आमचा .

झाला असता चौरंगा ,
   त्या नराधमांचा .

आदर्श आसती माझे ,
सावित्री , कल्पना अन् जिजाऊ .

अत्याचाराचा जाब विचारण्या ,
सांगा कोठे मी जाऊ ?

बदलून टाकू आता ,
पोकळ समाजव्यवस्था .

ऊघड तुझे लोचन ,
     हे न्यायदेवता .

✍ कवियित्री✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर ,416106 .

No comments:

Post a Comment