स्पर्धेसाठी
विषय -- मुंबईचा पाऊस
जागवल्या स्मृती ,
पुन्हा एकदा प्रलयाच्या.
पाहून रौद्ररुपातील ,
मुंबापुरीतील पावसाच्या.
जलमय झाली मुंबई ,
जशी सर्वत्र आणीबाणी .
खोटा ठरला अंदाज ,
नाही साचणार पाणी .
वाहतुक झाली ठप्प ,
रस्ते पाण्याखाली गेले.
पाण्यातच सारी जनता ,
जणू अस्मानी संकटच आले
नोंद विक्रमी पावसाची ,
वाढली धडधड हृदयाची.
बंद शाळा , बंद अॉफीस ,
लगबग घरी जाण्याची .
निचरा पाण्याचा व्हावा ,
खर्च झाला यासाठी खूप.
गेला सारा पैसा पाण्यात,
हा सर्वांच्या डोक्याला ताप.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ
जि. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment