राज्यस्तरीय काव्यस्पर्धेसाठी
विषय - माता रमाई
गरीबा घरची लेक रमाई ,
अकाली अनाथ झाली .
आई-बाप सोडून गेले ,
काका-मामांची कृपादृष्टी झाली.
लेक रमाई पत्नी भिमाची ,
अल्पवयातच जबाबदारी आली.
दुष्काळाने जरी होरपळली ,
स्वाभिमानाने मदत नाकारली.
झळ ना कधी पोहचू दिली ,
बाबासाहेबांना करुण रमाईने.
अथक परिश्रमाने नाही दमली,
संसार नेटका केला आईने.
निष्ठा, त्याग अन् कष्ट सतत ,
होते जीवनी सोबतीला .
समजूतदारपणाच्या साथीने,
योग्य स्थान दिले संयमाला.
ऊपाशी मुलांसाठी रमामातेचा,
जीव तीळतीळ तुटला .
डबा दागीन्यांचा मग तीने,
सहजपणे दिन हो केला.
धन्य ती रमाई,तीचे ते कष्ट ,
पोखरले शरीर सारे श्रमाने.
चिरशांती घेतली अखेरीस ,
वंदन माते माझे आदराने .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment