काव्यप्रज्ञांजली समूह आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धा 2018
फेरी क्र. 2 30/5/2018
विषय - विरह
आनंदाने व समाधानाने ,
चालले होते आयुष्य माझे .
संसारातील दोन फुलांसह ,
बहरत होते जीवन माझे .
नजर लागली का सुखाला ,
आनंदात असणाऱ्या जीवनाला ?
गेलास अवेळी , अचानक तू ,
वाटे बसली खिळ भविष्याला .
आठवणींने नयनी पाणी ,
सलते ह् दयी ती वेदना .
साहू कीती निमूटपणे मी ,
मिळणाऱ्या या यातनांना .
अशांत मी , सैरभैर मी ,
वादळातील नांव जशी .
विरहात तुझ्या रे साजना ,
सावरु मी स्वतःला कशी ?
ये परतूनी गरज तुझी ,
भकास या सुनसान जीवनी .
फोडला मी टाहो आकांताने ,
जणू थरथरली ही धरणी .
सावरेन पण वेळ हवा ,
तुझ्याशिवाय जगी जगण्याला .
नाही जमले परतायला तरी ,
बळ दे संकटांशी भिडायला .
कोड क्र. DPASG 1196
कवियीत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
No comments:
Post a Comment