शुक्रतारा
नभीचा तो शुक्रतारा ,
निखळून दूर गेला .
मंद वाऱ्याच्या झुळकीने ,
थिजवून आज गेला .
शब्दतेजाने तळपत राहिला ,
अवनीवरचा स्वरभास्कर .
प्रकाशित तो शब्दसुमनांनी ,
साहित्यात जाहला अमर .
झोपाळ्यावाचून झुलले ,
ते फुलायचे दिवस .
राजाराणीला भातुकलीच्या ,
आठवे कहाणीतले दिवस .
बोलायचे होते काही ,
पण बोललाच नाही .
धुंद रात्री पावसात ,
कधी भिजलोच नाही .
घडवून ईतिहास तुम्ही ,
या जन्मावर प्रेमच केले .
सप्तसुरांच्या मैफीलीतून ,
अलवार दूर तुम्ही गेले.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
No comments:
Post a Comment