राज्यस्तरीय अष्टाक्षरी स्पर्धेसाठी
विषय - सय माहेराची
सय माहेराची येता ,
जीव कासावीस होतो.
माय माझी बोलावते,
गांव मज आठवतो.
जन्म घेतला ऊदरी,
पांग कसे फेडायाचे.
ऋण नाही फिटणारं
कीती जन्म घालायाचे?
प्रेम माझ्या भावंडाचे ,
डोळा आणतयं पाणी .
सय माहेराची येता ,
ओठी स्फुरतात गाणी .
बाबा माझे मुर्तीमंत
रुप देवाचे दिसते .
नमस्कार चरणी या ,
आशीर्वाद सदा घेते .
सय माहेराची माझ्या ,
आहे सोबतच माझ्या .
साद घालते आईला ,
म्हणे अंतरीच तुझ्या .
कीती आठवू तुम्हाला ,
मन नाही हो भरत .
पाण्यावीण मासा जगी ,
नाही मला हो स्मरत .
अशी सय माहेराची ,
सर्व लेकींनाच येते .
गेली नाही आईकडे ,
तरी मनानेच जाते.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment