Monday, 29 April 2019

कथा ( रस्त्यावरचा संसार )

रस्त्यावरचा संसार

दुपारचे दोन वाजले होते...  उन रणरणत होतं. सूर्याच्या किरणांनी अंग भाजून निघत होते. रस्त्यावरील वाहतुक ही  तुरळक झालेली होती. जो तो आपल्या घराच्या  सावलीला जाण्याच्या घाईगडबडीत आपली वाहने जोरात नेत होता. उन्हाची धग सहन होत नव्हती. अशातच मी माझी चार चाकी गाडी घेऊन, रस्त्याने जात होते.  कुरुंदवाड ते जयसिंगपूर पंधरा-सोळा किलोमीटर अंतर.. रोज मी याच रस्त्याने जात असताना मला एक स्त्री दररोज दिसायची. तिच्याजवळ एक पांढऱ्या रंगाची ,मोठ्या आकाराची एक बादली, डोक्यावर गाठोडं  कधी ती रस्त्याच्या कडेला  कपडे धूत असताना दिसायची ,  तर कधी स्वयंपाक करत असताना.. सुरुवातीला मला वाटले की ती वेडी असावी. तिच्या संदर्भामध्ये पेपर मध्ये बातम्या सुद्धा आल्या होत्या.. त्यामुळे तीच्या बद्दल माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. एक दिवस ती मला दिसली तोपर्यंत माझी गाडी पुढे गेलेली होती म्हणून नाईलाजाने मी तशीच पुढे गेले. पण तिला भेटायचं असा मी मनाशी निर्धार केला. दुसऱ्या दिवशी मी तिला शोधतचं  सावकाश निघाले. कारखाना  परिसर सोडल्यानंतर काही अंतरावर मला ती दिसली. रस्त्याच्या कडेला बसलेली होती. मी थोडं जवळ जाऊन गाडी थांबवली. गाडीतून उतरले व थोडी घाबरतच तिच्या जवळ गेले. प्रथम मी तिला मराठीतून विचारलं.."  अहो, इथं रस्त्यामध्ये काय करताय? " कडेला बसा ना !!! अंगावरून गाडी जाईल की ? "  तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या नजरेमध्ये गोंधळ होता पण राग नव्हता. त्यामुळे माझे धाडस थोडे वाढले. मी तिला पुन्हा विचारलं ,"तुम्ही इथं काय करता ? आणि ती स्त्री बोलू लागली, "  यान ईल्ला "  मग माझ्या लक्षात आलं की ही स्त्री मराठी न  बोलता कन्नड बोलते आहे. आता आली का पंचाईत!!!  आता तिच्याशी बोलायचं म्हटलं की कन्नड आले पाहिजे ,त्याशिवाय काय माहिती मिळणार नाही... मग मी तिच्याशी मोडक्या-तोडक्या कन्नड भाषेमध्ये बोलायला सुरुवात केली. मी तिला म्हणलं , "रस्त्यावर कशाला बसला ? जरा पुढे सरकून बसा "  मला कन्नड मध्ये म्हणाली, " असू दे ऊन लागतं "  मग मी तिला म्हणाले,"अहो तुम्ही रस्त्यावर बसलाय ,थोडं पुढे सरकून बसा कुनी ठोकरल तर काय करणार ?  पण तिने चित्र विचित्र हालचाली करून  तोंडातल्या तोंडात  काहीतरी पुटपुटली पण ते काय मला समजलं नाही. मी पाहिलं , रस्त्यावरील लहान विटांचे तीन तुकडे घेऊन तिने चूल तयार केलेली होती. रस्त्यावरीलच  काटक्या गोळा केलेल्या होत्या. व त्याला जाळ लावलेला होता. त्या तीन विटांच्या चुलीवर एक छोटसं पातेलं ठेवलेलं होतं. त्या पातेल्यात तुरीची डाळ होती, पाणी घातलेलं आणि त्यामध्ये एका छोट्याशा प्लेटमध्ये हिरव्या मिरच्या धुऊन तोडून टाकत होती. मी तिला म्हटलं,"  भात भाकरी करत नाही का ?"  तेव्हा ती म्हणाली, "  करते ,आत्ता भात शिजवणार, पण मला भाकरी इथं करता येत नाही. मी खूप छान पातळ भाकरी करते. पण इथं कुठे रस्त्यावर साहित्य नसल्यामुळे मी कसं करणार?"  मी तिला विचारलं,"  तुमचं गाव कोणतं ?  तेव्हा ती म्हणाली , "रायचूर , रायचूर माझ गांव.. कर्नाटकातील, खूप लांब आहे.माझे नांव दुर्गम्मा नालारेड्डी "  मग मी विचारलं ,"  तुम्हाला मुलं नाहीत का ? "  ती म्हणाली ," आहेत, तीन मुलं आहेत " "  मग तुम्ही त्यांच्या जवळ का राहत नाही ?  असे रस्त्यावर का  राहता ?  यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. तिचा चेहरा एकदम गंभीर झाला. तिला थोडा त्रास झाला आहे तिच्या हावभावावरून लक्षात आले. आणि तिने थोड्या  रागातच काही शब्द उच्चारले. पण त्याचाही अर्थबोध मला झाला नाही. मी तिला म्हणाले, "   तुम्ही तुमच्या गावाकडे जाणार का ?  ती म्हणाली," हो जाते माझ्याकडे पैसे नाहीत."  मी म्हणाले, " तुमचा पूर्ण पत्ता सांगा "  पण ते काय तिला सांगता आलं नाही. गेले चार वर्षे मी अशी बाहेर आहे. कुणीतरी जेवायला देतं ,कुणी तरी पैसे देतो त्यातूनच मी चहा  पिते व खायला घेऊन खाते. मी म्हटलं , "  एक वृद्धाश्रम आहे तिथे तुला सोडू का " राहणार का तू तिथे ?  तर ते अतिशय गडबडीत मला म्हणाली,"  नाही मी कुठेही जाणार नाही.. तिच्या शब्दात ठामपणा होता.   मी म्हणाले का ?  का नाही जाणार ?  तिथे तुम्हाला जेवायला मिळेल अंगावर कपडे घालायला मिळतील."  मी तुम्हाला तिथे नेऊन सोडते."  तेव्हा तिने उत्तर दिले, "  नाही मला जायचे नाही कारण  मला कुणावर विश्वास नाही "  मी म्हणलं "  माझ्या ओळखीचे आहेत.  बरेच लोक राहतात .त्यांना जेवायला दिलं जातं. आता इथे तुम्ही  रस्त्यावरच राहता. तिच्या अंगावर चे  कपडे फाटलेले होते म्हणून मी विचारलं तिला ," माझ्या जवळचे कपडे तुला आणून देऊ का? " तर लगेच तिने आपल्या जवळ एक पिशवी होती त्या पिशवीतील नवीन दोन परकर ,ब्लाऊज , साडी काढून दाखवलं आणि मला एका बाईने दिलेले आहे. परकर माझ्याकडे आहेत असं सांगितलं, व दोन नवीन परकर दाखवले मी विचारलं, " कुठून आणलं? " बहुतेक तिला माझ्या प्रश्नाचा राग आला असावा." कुठून आणलं म्हणजे ? विकत आणले मी, कोणीतरी मला पैसे देते त्या पैशातून आणले." मी तिला खूप समजावून सांगितलं की वृद्धाश्रमात नाहीतरी घरी राहत जा ,तुला तुझ्या गावी सोडते तर ती कशाला तयार नव्हती. काही कागदपत्रे खहेत का हे विचारल्यावर पिशवीतील काही कागदं बाहेर काढली पण माझ्या हातात नाही दिली.कदाचित तिला माझा कींवा या जगातील कुणावरच विश्वास नसावा. तिला यासंदर्भात वाईट अनुभव आले असतील. " चहापाण्याला काय पैसे देणार असला तर द्या." तिच्या या बोलण्यावर मी तरी काय करणार?. शेवटी मी तिला थोडे पैसे दिले आणि तिथून निघाले. परत मी माझ्या गाडीत जाऊन बसले गाडी सुरु केली आणि गाडी तिच्या जवळून जाताना तिने आवर्जून मला दोन्ही हात जोडून हात वर करून नमस्कार केला खरोखरच ते माझ्या काळजाला भिडले. असे कितीतरी आईबाप असतील की जे मुलं असुनसुद्धा आपलं म्हातारपणीचे जीवन हे रस्त्यावर व्यतीत करत असतात. पाहताना वाईट वाटतं ,चुकीचं वाटतं. कोण कोण कोणाला विचारणार? सर्व चूक मुलांचीच असते असे माझं म्हणणं नाही.  म्हातारपण म्हणजे दुसरं लहानपणच असतं. ज्या पद्धतीने आपण लहान असताना आपण असंख्य चुका करत असतो आई-वडिलांना त्रास देत असतो म्हणून काय आई-वडील आपल्याला सोडून देतात? नाही ना? मग आपण का बरे  त्यांचा म्हातारपणीचा त्रास सहन  करत नाही ? का आपल्याला त्रास होतो ? .बारकाईने विचार केला तर ही एक परतफेडच असते. ज्या पद्धतीने आपणाला गरज असते लहानपणी त्यावेळेला आपले आई-वडील आपणाला सांभाळतात, आपल्या प्रत्येक चुका पोटामध्ये घालतात. आपण कितीही त्यांना त्रास दिला तरी ते सहन करतात. आपल्याला टाकून देत नाहीत. किंवा कुठल्या आश्रमात सोडून येत नाहीत. पण आपण मात्र मोठे झाल्यानंतर किती कृतघ्न होतो !!!!!! आपल्याला आपल्याच आई-वडिलांचा त्रास वाटू लागतो.  आयुष्यभर  ज्या आईवडिलांनी आपल्याला सांभाळलं, त्या आई-वडिलांचा आपल्याला आपल्या लग्नानंतर त्रास होऊ लागतो ते आपल्याला नकोसे वाटतात.  हे अत्यंत चुकीचे आहे. आपण म्हणतो की वृद्धांनी थोडं पाठीमागे येऊन विचार केला पाहिजे किंवा आपल्या नवीन पिढीचा विचार केला पाहिजे, या पद्धतीने एका लहान मुलाला सांगून त्याला समजत नाही त्याच पद्धतीने हे म्हातारपणी होत असत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंत मुलांना आई हवी असते आईचं कोणतेही काम त्यांना वाईट वाटत नसतं आणि जेव्हा त्यांचं लग्न होतं ,घरात सून येते आणि त्या वेळेला मात्र या सुनेच्या सांगण्यावरुन  आपण आपल्या आईला घराबाहेर काढतो. मग अशावेळी मुलांनी सुद्धा दोघींनाही व्यवस्थित रित्या समजावून सांगून सांभाळलं पाहिजे. आई-वडिलांना घराबाहेर काढणे हा काही उपाय नव्हे. अशा कितीतरी स्त्रिया ह्या रस्त्यावर आपली उपजीविका करत असतात. माझ्या पाहण्यात आलेली ही स्त्री...तिला पाहताना मनामध्ये कणव निर्माण होते.  पण भाषेची अडचण असल्यामुळे तिला कोणीही समजावून घेऊ शकत नाही. पेपर मधून बातम्या आल्या. पण काही उपयोग नाही. तिचा संसार उघड्यावरच, रस्त्यावरच तसाच चालू आहे.काय भविष्य असेल तिचे .....? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्नच...कधी मिळेल का उत्तर...?

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( मुलगी असता घरी )

स्पर्धेसाठी

कविता

विषय - मुलगी असता घरी

घर कसं भरल्यासारखं वाटतं
जेव्हा मुलगी असते घरी.
घर जसं आनंदाने लागतं नाचू
कानकोपरा घराचा लागतो हासू
अन् उजळतो आशेच्या प्रकाशाने,सदोदित
मुलगी असते शान घराची
सर्वांच्याच लाडाची .

मुलगी असते कन्यारत्न ,
उजळवते दोन्ही घरांना
सासर अन् माहेरही...
संस्कारारातून आपल्या देते
शिकवण ताई बणून सर्वांची.
प्रसंगी बनते आई प्रेमाची..

जाते जेव्हा दुसऱ्या घरी
काळजाला पाडते पीळ .
मातापित्यांच्या डोळ्यांना
लागते धार अश्रुंची अविरत.
हासण्यावारी नेती सगळे
मुलगीचे मन जपण्यासाठी.

तुकडा काळजाचा असते
जिवापाड प्रेमाने जपलेले ,
ते एक संवेदनशील रोप असते..संसारातील.
मुलगीच बनते काठी शेवटी
म्हातारपणी आयुष्याच्या .
जपा , वाढवा ,शिकवा तिला
आमभान येउद्या तिला
मिळूदे बळ निर्भय जगण्याला.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 28 April 2019

चित्रचारोळी ( विश्वासघात )

चित्रचारोळी

विश्वासघात

फसवणूक व विश्वासघात
आहे पाठीत खंजीर खुपसणे
जपण्यासाठी मित्रत्व आपले
जपा एकमेकांची नाजूक मने

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( बहावा )

चारोळी

बहावा

फुलला बहावा रानीवनी
संकेत पावसाचे मिळाले
आसुसलेली धरती जलासाठी
वाटे स्वप्न फळास आले

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( लाल गालीचा )

उपक्रम

लाल गालीचा

लाल केसरी गालीचा
लालतरुखाली अंथरला
आज्ञाधारक वृक्ष उभे ठाकले
देती समाधान पांथस्थाला

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

कविता ( रानवाटा )

स्पर्धेसाठी

कविता

विषय -- रानवाटा

रानवाटा नागमोडी ,
खुणावती मनाला.
वृक्षराई दोहीकडे,
सुखावती जीवाला.

तरुवर ,लतावेली,
नवलाई निसर्गाची .
चाखुनीया रानमेवा,
हौस भागे जिभेची.

समाधानी प्राणीजात,
मेळा पर्यावरणाचा.
फळे,फुले उधळीत,
दरवळ सुगंधाचा.

मन प्रसन्न नाचले,
वातावरण हासले.
दाट छायेत वनराईच्या,
मनमयुर हे नाचले.

गाऊ गीत आत्मसुखाचे,
होऊ तल्लीन रानीवनी.
प्रेमभावे सुखवूनी नित्य,
गाऊ रानाची गोड गाणी.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 27 April 2019

हिंदी लेख ( 1 मई महाराष्ट्र दिन और कामगार दिन )

          महाराष्ट्र दिन और कामगार दिन

कीसी एक घटना का महत्त्व जाणने के लिए लोग उसदिनके नाम से आनंदी होकर वह दिन मनाते है। ताकी बाकी लोगोंको भी पता चले की कभी ऐसा भी हुआ था। भारत में ही नहीं तो पूरे विश्व में भी ऐसे अनेक दिन मनाते है।उसमें से एक महत्वपूर्ण दिन है..महाराष्ट्र दिन और कामगार दिन..

महाराष्ट्र के इतिहास में 1 मई यह दिन बहुत मायने रखता है।स्वतंत्र महाराष्ट्र की माँग वो भी मुंबई के साथ...

1 मई 1960  को महाराष्ट्र राज्य की स्थापना हुई इसलिए महाराष्ट्र दिन के तौर पर बड़े उल्लास के साथ मनाया जाता है। महाराष्ट्र राज्य निर्मिती के लिए 106  लोगों ने बलिदान दिया था।  उनका स्मरण कि इस दिन को किया जाता है। 21 नवंबर 1956  को राज्य पुनर्रचना आयोग द्वारा मुंबई महाराष्ट्र को देने को नकारा था। इसलिए मराठी जनता पक्षों में हुई थी। इसके खिलाफ आवाज उठाया मोर्चा निकाला गया। उन्हे भगाने के लिए लाठीचार्ज किया गया। इसमें 106   आंदोलकोंको ने  जानू की आहुति दे दी और क्या को रोकने के लिए उन पर गोलियां बरसा दी गई। संयुक्त महाराष्ट्र के संग्राम में यह लोग हुतात्मा हो गए। यह सब देख कर सरकार ने पीछे हटकर मुंबई के साथ ही संयुक्त महाराष्ट्र की घोषणा 1 मई 1960  को की। भूत आत्माओं का स्मारक बनाया गया। हर साल इसी दिन महाराष्ट्र दिन मनाया जाता है इस दिन स्कूलों, सरकारी दफ्तरों को छुट्टी  दी जाती है। भाषावाद प्रांत के गठन के कारण महाराष्ट्र और गुजरात में विवाद होने लगे। दोनों ने भी भरसक प्रयास किया। आंदोलन छीड गया  और परिणाम स्वरूप  मुंबई के साथ महाराष्ट्र स्थापित हुआ। इसके लिए माननीय एस. एम. जोशी ,आचार्य अत्रे, सेनापति बापट,  माननीय यशवंतराव चौहान और उनके साथियों ने प्रयास किया था।

1 मई  की और एक विशेषता है, और वह यह है कि यह कामगार दिवस के तौर पर भी मनाया जाता है। सबसे पहले ऑस्ट्रेलिया में 8 घंटे काम करने के लिए वहां के मजदूरों ने पहली मांग की थी।  कामगार लोगों को 12 से 14  घंटे का काम करना पड़ता था। इसके अलावा उन्हें कुछ भी सहुलते नहीं थी। आंदोलन के बाद  उन्हें उनका हक मिल गया।उस दिनसे यह कामगार दिनके तौर पर मनाया जाता है। इसके बाद अमेरिका, कनाडा के मजदूरों ने भी अपनी मांग के लिए आवाज उठाया।  आंदोलन और मोर्चा को रोकने के लिए छह आंदोलनकर्ता मारे गए। उसके निषेध में पुलिस पर भी बम फेंका गया। जिसमें 50  पुलिस जख्मी हो गई। आंदोलन के समानार्थ 1 मई 1890  कामगार दिन के तौर पर मनाया जाने लगा। भारत में 1 मई 1923 में  मद्रास शहर में सबसे पहले कामगार दिन मनाया गया। पूरे विश्व के करीब 80  देशों में यह कामगार दिन मनाया जाता है। इस दिन अच्छा कार्य करने वाले मजदूरों का  गौरव किया जाता है।

लेखिका
श्रीमती माणिक नागावे.
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Friday, 26 April 2019

हिंदी अभंग रचना ( महाराष्ट्र राज्य )

अभंग रचना

महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र राज्य।
प्रणाम तुमको ।।
आशिष हमको ।
सदोदित ।

अच्छी परंपरा ।
संत महंतोंकी।।
समाजसेवाकी ।
यहाँ देखी ।

स्वातंत्र्य वीरोंके ।
बलिदानसेही ।।
शूरोंका तेजही ।
पुलकित ।

लावणीका बाज ।
हात डफपर ।।
नाचें तालपर ।
मनचली ।

लोक कलांओंका ।
सज गया मेला ।।
साहित्यिक गला ।
प्रकटित ।

माय है मराठी ।
स्वभिमानी बाणा ।।
होता उभरा सिना।
सदोदित ।

डोंगर खाईसे।
सह्याद्री सजा है ।।
नभपे झंडा है ।
हमेशा ही ।

शिखर है उँंचा।
कळसूबाई का ।।
पार करनेका ।
मनोबल।

वीर राणी झाँसी ।
लढी मर्दानीसी।।
एक ज्वालाकीसी।
वीर हुई ।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Thursday, 25 April 2019

चित्रचारोळी ( बालपण )

चित्रचारोळी

बालपण

घेऊन गालगुच्चा बाळाचा
ताई प्रकट करते प्रेम भावाचे
निवांत मांडीवर विराजमान
सुख मायेच्या सिंहासनाचे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( दुपार )

चारोळी

दुपार

रखरखलेली ,भाजणारी
अंगाची करणारी काहिली
ताप उन्हाचा असहनीय
ही दुपार नकोशी झाली

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( रुपगर्विता )

चित्रचारोळी

रुपगर्विता

रुपगर्विता रुप तुझे लोभस
अदा मोहक, मुखचंद्रमा छान
लोचनी प्रेम,हास्य ओठी शोभे
वसने,अलंकार भाळी टिकलीचा मान

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चित्रचारोळी ( प्रेमभाव )

चित्रचारोळी

प्रेमभाव

बाळराजे विसावले प्रेमभावे
अलगद बछड्याच्या अंगावर
भूक वात्सल्याची दोघांची
मानव असो वा असो जनावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( मताधिकार )

चारोळी
मताधिकार

मताधिकार बजाऊन आपण
असेलच निवडली योग्य व्यक्ती
बळी न पडता प्रलोभनांना
दाखवली लोकशाहीची शक्ती

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 23 April 2019

लघुकथा ( सलाम सैनिक हो.. )

स्पर्धेसाठी

शतशब्द कथा

सलाम सैनिक हो

माधवी सुट्टीवर आलेल्या सैनिक पती रमेशकडे अनिमिष नेत्रांनी पहात होती. काल रात्रीचा त्याच्या सहवासातील हळुवार प्रसंग आठवीत होती. तेवढ्यात मोबाईल वाजला. माधवीच्या काळजात चर्र..झाले. मोबाईल ऐकताना रमेशच्या  चेहऱ्यावरील भाव भरभर  बदलत गेले. तो ऊठला. तयारीला लागला.माधवीने ओळखले. दु:ख लपवून तीने त्याला नीरोप दिला.पण तिचे चित्त सगळे युद्धभूमीवर होते.

ती रोज बातम्यांकडे लक्ष देत असे. अखेर व्हायला नको होते ते झालेच. नियतीने डाव साधला. रमेश देशासाठी लढता लढता शहिद झाला.तिरंग्यात लपेटून रमेश गावी आला. माधवीचा हात आपसूकच आपल्या पोटावर गेला.सर्व गावाबरोबर माधवीच्या पोटातील बाळानेही बाबांंना सलामी दिली.माधवीचा निर्धार पक्का झाला. बाळाला सैनिकच बनवायचं. रमेशच्या स्वप्नांसाठी.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Monday, 22 April 2019

अभंग रचना ( महाराष्ट्र देशा )

अभंग रचना

महाराष्ट्र देशा

महाराष्ट्र देशा ।
प्रणाम तुजला ।।
आशिष मजला ।
सदोदित ।

थोर परंपरा ।
संत महंतांची ।।
समाजसेवेची ।
इथे आहे ।

स्वातंत्र्य वीरांच्या ।
बलिदानानेच ।।
शूर तेजानेच ।
उजळली ।

लावणीचा बाज ।
थाप डफावर ।।
नाच तालावर ।
थिरकली ।

लोक कलांचाच ।
भरलाय मेळा ।।
साहित्यिक गोळा ।
आसपास ।

माय ही मराठी ।
बाणेदार बाणा ।।
आहे ताठ कणा ।
सदोदित ।

नऊवारी साडी ।
धोतराचा सोगा ।।
सुताचात धागा ।
आवडतो ।

अशी गाती गाणी ।
विसरून भान ।।
स्वराज्याची आण ।
सर्वांनाच ।

डोंगर दऱ्यांनी ।
सह्याद्री सजला ।।
गगनी भिडला ।
महानच ।

शिखर ते उंच ।
कळसूबाई चे ।।
आहे चढायाचे ।
प्रयत्नांती ।

केसांचा आंबाडा ।
शोभतोय शिरी ।।
कुंकवाची चिरी ।
शोभतसे ।

थोर राणी झाँसी ।
लढली शूराने ।।
ती प्राणपणाने ।
वीर झाली ।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 21 April 2019

चारोळी ( भान )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- भान

भान असावे माणुसकीचे
स्वार्थांध दुनियेत जगताना
हात द्यावा सहकार्याचा
अलवार डोळे पुसताना

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( कोंडमारा )

कोंडमारा

अस्थिर जीवनात झालाय
कोंडमारा मानवी भावनांचा
संवेदनहीन यांत्रिक युगात
होतोय ऱ्हास नीतीमुल्यांचा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 20 April 2019

पुस्तक परीक्षण ( संस्कृत सुधा )

पुस्तक रसग्रहण  स्पर्धा

फेरी क्रमांक 4

संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी आहे. संस्कृत प्राचीन भाषा आहे. तिला देवांची भाषा असेही म्हटले जाते. सुभाषित हे या भाषेचे वैशिष्ट्य आहे. सुभाषिता मधून श्लोकाच्या माध्यमातून चांगले विचार सांगितले जातात. प्रत्येक सुभाषितांमध्ये अनेक चांगले विचार दडलेले असतात.  पण ते समजून घ्यायला हवेत.त्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. यासाठी ठराविक सुभाषितांचा मराठी मध्ये अर्थ सांगून ,त्याला गोष्टीची जोड देऊन , कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील डॉक्टर बी.ए. शिखरे यांनी बालकुमारांसाठी गोष्टीच्या रूपात "  संस्कृत सुधा " नावाचे पुस्तक लिहून ही गोष्ट सहज साध्य केली आहे. एकुण  30 सुभाषित असलेले हे पुस्तक म्हणजे सुभाषित व त्याच्या अर्थाची एक मेजवानीच म्हटली पाहिजे.मुखपृष्ठा सह एकूण 88 पानांचे हे पुस्तक आहे. सांगली येथील डॉक्टर व्यंकटेश जंबगी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. लेखक डॉक्टर बी.ए.शिखरे यांनी ही पुस्तिका त्यांच्या नातवंडांना अर्पण केलेले आहे व  सुभाषित रुपी शुभाशीर्वाद दिले आहेत. सोप्या भाषेमध्ये त्यांनी प्रत्येक सुभाषिताचा  अर्थ सांगून त्या संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे,  जेणेकरून लहान मुलांच्या ते सहज पचनी पडेल. पुस्तकाच्या सुरुवातीलाच "आत्मविश्वास" या कथेने सुरुवात झालेली आहे यातून आत्मविश्वास जर आपल्या अंगी असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो हे या गोष्टीतून त्यांनी या  सुभाषितांच्याद्वारे समजावून सांगितलेले आहे. "ओंजळीतील फुले' या प्रकरणांमध्ये त्यांनी आपले मन नेहमी चांगलेच ठेवावे असे सांगितलेले आहे. ते सांगताना ते म्हणतात, 
अंजलीस्थानि अंजली पुष्पानि  वासयंन्ति करद्वयंम् ।
अहो!  सुमनसां प्रीति: वामदक्षिणयो:समा: ।।
यातून लेखकाने संकुचित विचार सोडून सर्वांशी प्रेमाने वागण्याचा सल्ला दिला आहे. 'दुर्जनाशी संग- सुखाचा भंग" या कथेत आपण नेहमी सज्जनांच्या सहवासात राहिले पाहिजे हे सुभाषितांच्या माध्यमातून  समजावून सांगितले आहे. यामध्ये त्यांनी अग्नी आणि लोखंड यांचे अतिशय समर्पक असे उदाहरण दिले आहे. "नेहमी खरे बोलावे" कथेतून त्यांनी प्रिय सत्य व अप्रिय सत्य यात फरक आहे हे उदाहरणावरून समजावून सांगितले आहे. "संत परोपकारासाठी जगतात" या कथेतून त्यांनी ज्या पद्धतीने परोपकाराने वागून परतफेडीची अपेक्षा न करता   वागलं पाहिजे व स्वतःबरोबर दुसर्‍याचेही कल्याण केले पाहिजे हे खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे.  "जीवनात शिक्षणाचे महत्त्व" या कथेमध्ये त्यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवना बद्दल काही उदाहरणे दिलेले आहेत त्यांनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेतला आहे. पण एक चूक झालेली आहे ती म्हणजे लेखकाने असे लिहिलेले आहे की सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी गीतांजली हा काव्यसंग्रह लीहला व या काव्यसंग्रहाला 1952 साली नोबेल पारितोषक मिळाले हे मला चुकीचे वाटते.  "शिक्षक कसा असावा" "विद्यार्थी कसा असावा" या पाठातून त्यांनी आपण नेहमी आपले आचरण चांगल्या पद्धतीने ठेवले पाहिजे अध्ययन-अध्यापन पद्धती सर्वांना समजेल व आफले ज्ञान आणखी वाढले पाहिजे हे साने गुरुजींच्या उदाहरणावरून समजून सांगितलं आहे. विद्यार्थी कसा असावा हे सांगत असताना त्यांनी " काकदृष्टी बकध्यानं श्वाननिद्रा तथैव च  अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम् ।। असा विद्यार्थी आयुष्याच्या जीवनामध्ये यशस्वी होतो. "उद्योगाला पर्याय नाही " या पाठातून त्यांनी कोणतेही कार्य हाती घेतले की ते आपण प्रामाणिकपणे केले तर यशस्वी होतोच ,फक्त मनामध्ये कल्पना आणून शांत बसणे हे चुकीचं आहे. कोणत्याही यशासाठी स्वतःचे प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगितले आहे. 'साधू हा हिरा आहे 'ही कथा सांगताना ते असे म्हणतात की,
" शैले शैले न  माणिक्यं भौक्तिकं न गजेगजे । 
  साधवो न हि सर्वत्र चंदनं न वने वने ।।
यातून त्यांना असे सांगायचे आहे की साधू बनणे इतके सोपे नाही .साधू बनणे म्हणजे विकारांच्या वर मिळवलेला विजय. साधू हे माणकांच्या प्रमाणे महत्त्वपूर्ण असतात व दुर्मिळ असतात. "सत्य, कंठाचे भूषण"  या कथेत ते असे म्हणतात, ज्याप्रमाणे हातांचे भूषण दान देणे आहे तसं सत्य बोलणे हे आपल्या कंठाचे भूषण आहे. या गोष्टीतून त्यांनी मुलांना दान द्यावे व खरे बोलावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. "अयोग्य कोणीही नाही" या कथेतून त्यांनी जेव्हा आपल्याला मिळतो तेंव्हा त्या संधीचा योग्य वापर केला तर जीवनामध्ये यशस्वी होतो हे बाबा आमटे यांच्या उदाहरणावरून अतिशय व्यवस्थित रित्या समजावून सांगितले आहे. "राजापेक्षा विद्वान श्रेष्ठ"  या कथेतून विद्वान किती श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात  ,       विद्वत्वंच नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन ।
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पुज्यते।।  ज्ञानाची सर्वत्र पूजा होते त्यामुळे आपण ज्ञानी बनले पाहिजे हा संदेश यातून मिळतो.  "मंत्र स्तुती स्त्रोत्रांची शक्ती" यातून त्यांनी हेच सांगितले आहे.  त्याचप्रमाणे "वक्ता जन्मावा लागतो "या कथेद्वारे त्यांनी सुभाषितांचा आधार घेऊन की वक्ता हा जन्मावा लागतो. दहा हजारांमध्ये एखादाच व्यक्ता होऊ शकतो. अज्ञानरूपी अंधकारमय जगामध्ये वावरत असताना ज्ञानाचा दिवा दाखवणारा गुरु जर आपल्याबरोबर असेल तर आपण सन्मार्गाला लागतो तेच त्यांनी समाजात "गुरु चे महत्व 'या कथेतून पटवून दिले आहे. कोणतेही काम आपण हाती घेतले की ते काम करण्याची इच्छा आपल्या अंगी असली पाहिजे ,आपल्या मनात असले पाहिजे तरच ते काम सहज साध्य होते ."इच्छा तेथे मार्ग" या कथेतून व्यक्त केला आहे. व्यक्तींचे व प्राण्यांचे  लक्षणं वेगवेगळी असतात. त्यामध्ये चातुर्य हे स्त्री चे लक्षण आहे. त्याच्या जोरावर ती आपलं घर यशस्वी करण्यामध्ये सफल होते हे सांगितले आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा  धोकादायक असतो. कोणतीही गोष्ट करताना त्याचा अतिरेक होऊ देता कामा नये हाच आशय  "अतिपरिचयात अवज्ञा" या कथेतून सांगितले आहे.  ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळते त्या वेळेला त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळत नाही. दातृत्व दान परंपरेचे द्योतकच आहे "दानाचे फळ "या कथेतून लेखकाने सांगितले आहे. आपण नेहमी दान करावे . दान करत असतानाही ते सत्पात्री दान असावे याचाही उल्लेख आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या वस्तूचे दान देतो त्यावेळी त्या पाठीमागचा आपला भाव हा भक्तीचा असला पाहिजे. भक्ती युक्त दान महत्त्वाचे हे पटवून दिले आहे. प्रसिद्धी कोणाला नको असते. प्रसिद्धी सर्वांनाच हवी असते. समाजामध्ये अशी काही माणसे आहेत की जी प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत करतात. "प्रसिद्धीपरान्मुखता, दुर्मिळ" या कथेतून  हे  थोर विचारवंत दादा धर्माधिकारी यांच्या उदाहरणावरून त्यांनी सांगितलेला आहे .  मानवाने सतत क्रियाशील राहिले पाहिजे. कार्य करत राहिले पाहिजे. आळस करता उपयोगाचे नाही. आळस माणसाचा शत्रू आहे. त्यांनी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाची कथा सांगितलेली आहे. तो मुलगा स्वतः पैसे कमवत नाही तोपर्यंत त्याला त्या पैशाची किंमत कळत नाही हे दाखवून देण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला पैसा कमवण्यासाठी कसे उद्युक्त केले हे या कथेतून सांगितले आहे. अन्नदान रक्तदान विज्ञान याबरोबर महा नशीबवान आहे असे "ज्ञानदान अति महान" या कथेतून सांगितले आहे व शाहू महाराजांचा संदर्भ घेऊन ज्ञानाचा कुंभ पिढ्यानपिढ्या अज्ञानाच्या अंध:कारात भरडल्या गेलेल्या होत्या. त्यामध्ये कशाप्रकारे विश्वास निर्माण केला व त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात मध्ये आणलं व त्यांना सुख समाधान प्राप्त करुन दिले हे सांगितले आहे. सत्याला कधीही मरण नसते न्यायाने ,प्रामाणिकपणे कोणतेही काम मिळवले किंवा कष्ट केले तर ते चिरकालीन ठरते व त्याचे समाधान आपल्याला मिळते अन्यायाने मिळवलेला पैसा सुखाचा वाटत असला तर तो अनंत काळ टिकत नाही अन्यायाने मिळवलेला पैसा टिकत नाही या कृतीतून त्यांनी सांगितलेले आहे व आपण कोणावरही कधीही अन्याय न करता सर्वांना सहकार्य केले पाहिजे हे सारखे सांगितले आहे. जो विद्याविभूषित असतो शिक्षित असतो व सर्वांशी सज्जनपणे वागतो अशा माणसाला सर्वजण पुजतात त्याला मान देतात याउलट जो मनुष्य दुर्जन आहे अहंकारी आहे घमेंडखोर आहे तो कितीही शिकला कितीही विद्याविभूषित असला तरी सुद्धा लोक त्याच्यापासून दूर राहतात आणि म्हणून आपण कोणतेही मित्र करत असताना सुशिक्षित , सज्जन आहेत की  नाही हे पाहिले पाहिजे "विद्याविभूषित दुर्जन टाळावा"  या कथेतून सांगितले आहे. "आभाळमाया" या कथेतून त्यांनी आपला व परका भाव मानवाच्या मनामध्ये असतो तो किती चुकीचा आहे हे दाखवून दिले आहे त्यासाठी त्यांनी अण्णा हजारे यांचे उदाहरण दिलेले आहे .त्यांनी असे सांगितले आहे की कधी आपण कुणालाही भेदभाव न करता आपलं मन नेहमी आभाळाप्रमाणे मोठं ठेवले पाहिजे व हे विश्व माझे कुटुंब आहे हा विचार आपल्या मनात बिंबवला पाहिजे. दुर्जनांच्या बरोबर कधीही मैत्री करू नये कारण जेव्हा आपण या लोकांशी मैत्री करतो त्यावेळेला जरी आपण त्यांच्यावर उपकार केले तरी ते आपल्याशी अपकारानेच वागत असतात हे त्यांनी "दुर्जना बरोबर मैत्री करू नये' हे मगर आणि माकड या कथेतून अतिशय सुंदर रित्या मांडलेले आहे. जीवन जगत असताना आपल्यावर असे अनेक प्रसंग येतात की त्या वेळेला आपल्याला क्रोध म्हणजे राग येत असतो आणि रागाच्या भरांमध्ये जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला अविवेकी गोष्ट होत असते ,म्हणून आपण कधीही  राग आला की थोडा वेळ आपण शांत राहिले पाहिजे, त्याच्यावर विचार केला पाहिजे . क्रोध सगळ्या दुःखाचे मूळ या कथेतून त्यांनी सांगितलेले आहे. "मौन सगळ्या सिद्धीचे कारण आहे"  या कथेतून त्यांनी किती महत्त्वाचे आहे हे सांगितलेले आहे ज्या वेळेला आपण मौन बाळगतो त्या वेळेला आपली बौद्धिक क्षमता वाढते व दुसऱ्यांच्या मनामध्ये आपण आपले स्थान निर्माण करू शकतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशाप्रकारे एकूण 30 कथातून सुभाषितांचा अतिशय सुंदर रित्या मेळ लेखकाने या ठिकाणी घातलेला आहे 31व्या प्रकरणातमध्ये काही संस्कृत म्हणी व वाक्यप्रचार दिलेले आहेत की ज्यांचा वापर आपण रोजच्या जीवनामध्ये करू शकतो व आपले संस्कृतचे ज्ञान वाढवू शकतो  खरोखरच हे पुस्तक  बालकुमारांच्यासाठी गोष्टीरूप पद्धतीने डॉक्टर शिखरे यांनी अतिशय सुंदर आणि त्याची मांडणी केलेली आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेले निसर्गचित्र तिच्यामध्ये मगर आहे आणि या मगरीला एक माकड झाडावरून खायला देत आहे आणि खाली अतिशय सुंदर हिरवळ आहे, पाणी आहे हे सर्व पाहत असताना  कोणताही बालक याकडे सहज आकर्षित होईल असे आहे. कविता सागर प्रकाशन जयसिंगपूर यांनी या पुस्तकाची बांधणी अतिशय सुंदर रीतीने केलेले आहे.त्यांनाही धन्यवाद.लेखकाच्या हातून असेच लेखण बहरु दे हीच सदिच्छा

रसग्रहण
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862630