Sunday, 5 November 2017

जीवन नाट्य -- कटु सत्य

काव्यस्पर्धेसाठी  

विषय -- जीवन नाट्य

जीवनाच्या प्रवाहात ,
भेटले अनेक सखेसोबती .
खरा माझा सोबती ,
निघून गेला वरती .

आठवणींच्या हिंदोळ्यावर ,
मन हेलकावे खाते .
वर खाली होताना ,
मन भारावून जाते .

जडावलेल्या अंतःकरणाने ,
मन माझे आक्रंदते .
पाहता चिमुकल्या जीवांना ,
बळेच ते शांत होते .

शोधून मग सापडत नाही ,
मनांत घट्ट रुतून बसतं .
भानावर येता लक्षात येतं ,
कटू सत्याचं ते वास्तव असतं .

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment