स्पर्धेसाठी
जागतिक नागरिक दिनानिमीत्त काव्यस्पर्धा
नागरिकांची कर्तव्ये
भारताचे आम्ही रहिवासी ,
अभिमान याचा आम्हाला.
उन्नतीसाठी याच्या नेहमी,
प्रयन्तांची ग्वाही हो तुम्हाला
कर्तव्याप्रती होऊ जागरुक ,
कर्तव्ये समजाऊन घेऊ .
संविधानाचे करुन पालन ,
दुस-यांनाही सांगत जाऊ.
राष्ट्रीयतेच्या आदर्शांना ,
सतत मानवंदना देवू .
भारताच्या अखंडत्वासाठी
प्राणाचीही बाजी लावू .
रक्षण देशाचे करणे ,
प्रथम कर्तव्य आपल्यासाठी
बंधुभावाची भावना मनी ,
गौरवशाली संस्कृतीसाठी .
करू मातापित्यांचे रक्षण ,
कर्तव्य आपले महान आहे.
देशहीताबरोबरच आपल्या,
भावी पिढीला घडवायचे आहे.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर .
No comments:
Post a Comment