क्रांतीची फुले समुहातर्फे
लेख स्पर्धा
विषय -- शिक्षणाचे महत्व
जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला योग्य अयोग्य याचा सारासार विचार करताआला पाहिजे. मनाचा निग्रह महत्वाचा आहे . पण हे सर्व शिक्षणाने सहज साध्य होते .शिक्षण म्हणजे फक्त साक्षरता नव्हे.
लिहायला वाचायला आले तर तो व्यक्ती साक्षर होईल , पण संस्कारी होईल की नाही हे सांगता येणार नाही.त्यासाठी चांगले , कसदार ,प्रभावी वाचन होणे गरजेचे आहे .शिक्षणाने हे सर्व सहज शक्य आहे .
शिक्षणाची आवड मनापासून असली पाहिजे. तरच कीतीही अडचणी आल्या तरी त्या पार करुन लिलया त्यातून बाहेर पडता येते . शिक्षणाने मनाची मशागत होते.संस्कारक्षम मन बनते व आपल्या आचरणाने समाजात ती व्यक्ती आदरणीय बनते .
सर्व थोर व्यक्ती शिक्षणामुळेच महान होऊ शकल्या .मग ते शिक्षण घरचे असूदे नाहीतर शाळेतील असूदे.शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी शिक्षण घेणे व त्यात पारंगत होणे नव्हे तर त्या शिक्षणाचा व्यवहार ज्ञानात कीती ऊपयोग करुन घेतो कींवा ते ज्ञान कीती ऊपयोगी पडते हे महत्वाचे आहे .शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रीया आहे.
शिक्षकांच्या पैशावर ठेऊन त्यांना नांवे ठेवणे चुकीचे आहे.चला तर मग आपण शिकूया , शिकवूया , शिकायला मदत करुया.
धन्यवाद .
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment