काव्यस्पर्धेसाठी
विषय - गर्व नसावा एवढा
आयुष्यात या जगताना ,
गर्व नसावा कधी एवढा .
अहंभाव सोडून जगा ,
मान मिळेल मग केवढा.
गर्वाचे घर नेहमी खालीच ,
असते हे खरे आहे.
निस्वार्थ भावना नेहमी ,
येते कामाला सत्य आहे.
निगर्वी वेत्ती आपली ,
असावी नेहमी सोबतीला.
जोडली जातात माणसे ,
प्रेमाणे आपल्या साथीला.
प्रेम आपुलकी सहानुभूती ,
असावी आपल्या हृदयी.
पाझर फोडेल नक्कीच ,
हृदयी त्या निर्दयी .
हसत असावे फुलापरी ,
फुलवा जीवन दुस-याचे.
सुगंधाने आपल्या कर्तृत्वाच्या ,
जीवन घडवा सर्वांचे .
सुंदर आहेआयुष्य आपले,
आणखी सुंदर करुया .
गर्व सोडून जीवनामध्ये,
आनंदाने जगी राहुया .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment