अष्टाक्षरी स्पर्धेसाठी
विषय - बळी पिकवतो मोती
शेतकरी भाऊ माझा ,
देशासाठी राबतोय .
मरमर कष्टूनही ,
ऊपाशीच झोपतोय.
दया कधी कुणा यावी,
कष्टताना शिवारात .
बळी पिकवतो मोती ,
माती येते पदरात .
घाम गाळतो शेतात ,
तेंव्हा पिकतात मोती .
अंग लकाके घामाने ,
तेंव्हा धान्य येते हाती .
दाम कामाचे देऊया ,
कष्ट त्याचे खूप झाले .
घरीदारी दैन्य त्याच्या ,
कधी नाही ध्यानी आले .
करु कष्टाची हो पूजा ,
मान पोशिंद्याला देऊ .
दोघे मिळून राबूया ,
शांती त्याच्या जिवा देऊ .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड.
No comments:
Post a Comment