Thursday, 14 May 2020

मराठी लेख ( मोबाईल )

मोबाईल

मोबाईल आजच्या युगाची एक जीवनावश्यक वस्तू बनून राहिली आहे.आजचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे.संगणकाचे युग आहे.मोबाईल चे खूप प्रकार आहेत.साधा फोन,स्मार्ट फोन,टॅब,इ.प्रत्येक कंपनीप्रमाणे मोबाईल ची वैशिष्ट्ये बदलत असतात.आपल्या कंपनीचाच मोबाईल ग्राहकांनी विकत घ्यावा यासाठी प्रत्येक कंपनी विविध योजना,सोयी,सवलती देत असते.त्याचप्रमाणे आजचा युवक जो मोबाईल चा चाहता व मोठा वापर करणारा वर्ग आहे. त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने आवडत असतात.
मोबाईल आज जिवनावश्यक वस्तू बनली आहे.आज मोबाईल शिवाय जगणे ही आश्चर्यकारक गोष्ट बनली आहे. कारण मोबाईल शिवाय आज कुणाचाही दिवस उगवत नि कींवा मावळत नाही. मोबाईल चा वापर इतके अंगवळणी पडले आहे की आज बाकी काही नसले तर चालेल पण मोबाईल पाहीजेच अशी अवस्था आहे.एक छणभरही मोबाईल बाजूला ठेवायचे म्हटले तर आज युवावर्गाला अडचणीचे जात आहे.
आच जन्मलेल्या बाळांपासून ते वयस्कर लोकांच्या पर्यंत हे मोबाईल प्रेम कीती आहे यावर अनेक जोक्स, व्हिडीओ येत आहेत ते  पाहून आपली हसता हसता पुरेवाट होते.पण तेवढेच वैषम्यपण वाटते.कारण आजचघ पिढी कुठल्या दिशेला चालली आहे हे कळायला मार्ग नाही. आजची आधुनिक आई मुलांच्या त्रासापासून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देतात.मग हे खेळण त्या मुलांच्या जीवनाचे अविभाज्य घटक कधी बणून जातो कळतचं नाही. मग ही मुले मोबाईल च्या व्यसनाच्या आहारी जातात की मोबाईल त्यांच्यापासून बाजूला काढणारा वाईट ठरतो.कीतीतरी अशा घटना घडल्या आहेत की मोबाईल वापराला बंदी घातल्यामुळे काही मुलांनी आत्महत्या केल्या आहेत तर काहींनी आपल्या घरच्या लोकांचे खून केले आहेत.मुले,मुली अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ मोबाईल वरील गेम खेळण्यामधेच व्यतीत करतात.
सतत मोबाईल ची स्क्रीन डोळ्यासमोर असल्यामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होत आहेत. अंशतः कींवा कायमचे अंधत्व येणे,डोळ्यांचे बाकी विकार उद्भवणे,डोळे चुरचुरणे,दृष्टीपटलावर परिणाम होणे.अशा अनेक प्रकारच्या व्याधी निर्माण होतात.हे विद्यार्थी व लहान मुलांच्या बाबतीत झाले. त्याचबरोबर घरातील स्त्रीयांच्याबाबतीतही अशाच घटना घडतात. जास्तीत जास्त वेळ मोबाईल वर घालवल्यामुळे घरांतील कामांवर परिणाम होऊन घरात कलह निर्माण होत आहेत.काही ठिकाणी तर घटस्फोट देखील झाले आहेत.त्यामुळे याचा वापर जपूनच केला पाहिजे.
मोबाईल वाईट आहे असे नाही. मोबाईल मुळे ,त्यातील इंटरनेट सेवामुळे आज जग आपल्या मुठीत आले आहे. कीतीही लांब असलेल्या व्यक्तीशी आपण प्रत्यक्ष बोलू शकतो,व्हिडीओ द्वारे पाहू शकतो.महत्वाची कागदपत्रे एका क्षणात या देशातून त्या देशात पाठवू शकतो.आपला कीतीतरी वेळ व पैसा या मोबाईल मुळे वाचला आहे.
आजतर या लॉकडाऊनच्या काळात या मोबाईल मुळे कीतीतरी लोकांची सोय झाली आहे. कामधाम नाही, घराबाहेर पडायचं नाही, कुणाला भेटायचं नाही अशा अनेक निर्बंधामुळे सगळे घरीच आहेत.अशावेळी सर्वांच्याकडे मोबाईल असल्यामुळे सर्वजण सुस्थितीत दिसतात. नाहीतर मानसिक संतुलन बिघडून कोण कायकाय केले असते याची कल्पनाच न केलेली बरी.
त्यामुळे मोबाईल हा योग्य कारणासाठी, योग्य वेळेपुरता,जर वापरला तर आपल्याला खूप फायदेशीर आहे. आपले जीवन कसे बनवायचे आहे ते आपल्या हातात आहे..

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment