स्पर्धेसाठी
कविता
विषय- व्यथा कामगारांच्या
शिर्षक- कामगार
खळगी पोटाची भरण्यासाठी,
दिवसरात्र राबतात कामगार.
श्रमामुळेच त्यांच्या होतात,
मालकांचे दिवस यादगार.
सोडून येतात गांव दुरवर,
वाली ना त्यांचा कुणी येथे.
गरजवंतासारखी खितपत,
पडती घरातील मंडळी तेथे.
जरी आल्या अनंत अडचणी,
तमा न कुणा नसे मालकाला.
बसले फक्त करण्या शोषण,
नाही किंमत इथे याचकाला.
ढोरासारखे घेती राबवून,
मोबदला मागता डळमळती.
भागवताना मागण्या मुलांच्या
मने बापांची सदैव तळमळती
वंचना साहताना वेदना उरी,
नशिबाला दोष फक्त हाती.
कर्जातच आयुष्य खपले,
व्हायचे काय दुसरे फक्त माती
व्यथा कामगारांची ऐकण्या,
उभा महाराष्ट्र आहे जागा.
नको पडू विवंचनेत बांधवा,
नको करु आता कधीही त्रागा.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
सदर कविता स्वरचित व स्वलिखित असून संपूर्ण/ अंशता अनुदानित किंवा चौर्य नाही.
No comments:
Post a Comment