आजचा उपक्रम
कविता
होय मी तिरंगा बोलतोय
तीन रंग माझे बोलके ,
त्यागाची साक्ष देतो भगवा.
मांगल्य त्या शुभ्रतेत असे ,
समृद्धीचे लक्षण हा हीरवा .
दिली आहुती प्राणांची ,
माझ्यासाठी स्वातंत्रवीरांनी.
त्यातूनच परत नीपजले ,
हजारो वीर स्वातंत्रसेनांनी .
सान , थोर सारी जनता ,
टपली करण्या माझे रक्षण .
दिली आहुती प्राणांची ,
माझ्यावर करुन औक्षण .
आज पाहतो इतिहास मी,
अभिमानाने फुलते छाती.
झेंड्यासाठी कलह पाहता ,
माना शरमेने झुकती.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ,
जि.कोल्हापूर
No comments:
Post a Comment