स्पर्धेसाठी
शिवकाव्य
विषय- राजे मनामनातले
शिवनेरीगड पावन झाला,
पाहून बाळ शिवबाला.
कौतुकाने निरखत राहिला,
शिवबांच्या गोड बाळलीला.
माता जिजाऊ थोर माउली,
खाणच जणू संस्काराची .
दिले बाळकडू रणनीतीचे,
पेटवली मशाल स्वातंत्र्याची.
जमवून मावळे सोबतीला,
शपथ रायरेश्वरी घेतली.
स्वराज्याचा रचला पाया,
चिंगारी मनी अशी पेटली.
तंत्र गनिमी काव्याचे ,
दुष्मन कापे थरथर.
सर करतच निघाले पुढे,
काबीज गड कील्ले भरभर.
गरीबांचा वाली छत्रपती,
मानली परस्त्री मातेसमान.
आधार ठरला शेतकऱ्यांना,
वाटती सर्वां देवासमान.
राजे मनामनातले खास,
प्रेरणास्थान भावी भारताचे.
घातले अंजन जनतेला,
जातपात विरहित समाजाचे
छत्रपती शिवाजी महाराज.
दैवत ठरले सकलजनांचे,
अंगी बाणवून शूरवीरता,
करुया मनोभावे नमन तयांचे.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment