Monday, 30 September 2019

कविता ( माझे जीवनगाणे )

आ.भा.शिक्षक साहित्य कला-क्रीडा मंच ( राज्य ) आयोजित कविता स्पर्धेसाठी

कविता

विषय - माझे जीवनगाणे

लेक लाडकी आईबाबांची,
लाडाकोडात वाढलेली.
सुसंस्काराच्या मुशीतून,
तावूनसुलाखून निघालेली.

शिक्षणाची आस मनाला,
कामाचा ध्यास जिवाला.
श्रमप्रतिष्ठा अंगी बाणली,
जगणे अर्पिले आत्मप्रतिष्ठेला

सुखावले मी मातृत्वाने,
संसारवेलीवरच्या फुलांसवे.
कर्तव्यदक्ष गृहीणीसारखी,
रमले मी आनंदाने पतीसवे.

ज्ञानमंदीरी जीव बहरला,
आदर्श बालक बनवण्यासाठी
विद्यार्थीप्रिय बनून शिक्षिका,
प्रेरित केले ज्ञानार्जनासाठी.

अघटित घडले जीवनामध्ये,
जिवनसाथी सोडून गेला.
पडद्याआड काळाच्या जावून,
पोरकेपणा मुलांच्या माथी आला.

दु:खाने मग आक्रंदले मन,
सैरभैर मुलांसह मी झाले.
सावरुन मग पाहून पिलांना,
कर्तव्याप्रती सजग मी झाले.

यशस्वीपणे भरारी मारून,
फडके पताका यशोशिखरी
कर्तृत्वाने छाती फुलली,
अभिमान दाटला माझ्या उरी.

असे हे माझे जीवनगाणे,
सोन्यासारखे झगमगले.
संघर्षातून स्वकर्तृत्वाने,
जगी स्वप्न हे साकारले.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

चारोळी ( अनाथ )

स्पर्धेसाठी

कलाविभाग

अनाथांच्या तोंडी गोड घास
देताना मन तृप्त, शांत होते
पाहून निरागसता चेहऱ्यावर
जीव हा वेडावून जातो.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 29 September 2019

सहाक्षरी (मंदिर )

उपक्रम

सहाक्षरी

विषय- मंदिर

पावन मंदिर
देऊळ देवाचे
प्रसन्न मनाने
दर्शन घ्यायचे

संतोष मनाचा
येथेच मिळावा
चित्ती समाधान
मोद गवसावा

संकट समयी
भाविक धावती
मनीच्या भावना
देवास सांगती

भावे नक्षीकाम
आरास रंगाची
पणती ज्योतींचे
वेगळ्या ढंगाची

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 27 September 2019

चित्रकाव्य ( फुलपाखरू )

स्पर्धेसाठी

चित्रकाव्य

फुलपाखरू

फुलांफुलांवरुन फिरत असते,
गोड ,नाजूक फुलपाखरू.
गौर असो वा गुलाबफुल,
लागते ते सर्वत्र भिरभिरु.

लाल रंग हा गौरी फुलांचा,
नाजूक देठ हा लवतो खाली.
कळ्या पोपटी शोभून दिसती,
पालवी हिरवी हसू लागली.

रोप उभे हे ताठ मानेने,
साहत भार हा सुमनांचा.
काळेपांढरे फुलपाखरू,
आस्वाद घेते मधुरसांचा.

शोषून मकरंद अलगदपणे,
आनंदाने घेते विश्रांती.
अंगी शोभे ठिपक्यांची नक्षी,
उजळून निघते मग ही कांती.

लालहिरव्या हिरवाईवर,
अलगद विहरते मुक्तपणे.
किमया निसर्गाची पाहून,
वेडे मन नाचते आनंदाने.

कवयित्री ©®

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

सहाक्षरी ( आधार )

उपक्रम

सहाक्षरी

विषय -- आधार

सर्वांना हवासा
असतो आधार
वाटते कुणीही
नसो निराधार

आई व बाबांचा
सर्व कुटुंबाला
नेहमी दिलासा
संकट वेळेला

शाळेत गुरुजी
ज्ञानच देतात
साधार शिकणे
सदा सांगतात

समाजाची शाळा
खूप शिकवते
प्रत्येकाला मात्र
अनुभव देते

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Thursday, 26 September 2019

चारोळी ( हास्य )

उपक्रम

चारोळी

विषय- हास्य

हास्य तुझ्या अधरी येता
साठली रक्तीमा गालावर
मोहरुन काया बावरली
शहारा आला अंगावर

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Sunday, 22 September 2019

चारोळी ( निष्ठा )

चारोळी

निष्ठा

ठेवून निष्ठा मूल्यांवर सदैव
आईबाबांची करावी सेवा
जिवंतपणी माणूसकी दाखवेल
मिळेल त्यालाच आशिष मेवा

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 21 September 2019

चित्रचारोळी ( ललना )

चित्रचारोळी

करड्या लाल पेहरावातील
राजपूत ललना करते विचार
हात भरला हस्तिदंती बांगड्यांनी
माठ शेजारी शोभे भूमीवर

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 17 September 2019

चारोळी ( नणंद भावजय )

स्पर्धेसाठी

चारोळी क्र. 1)

नणंद भावजय

नाते नणंद भावजयीचे
काळानुसार बदलत गेले
बहीणीच्या अन् मैत्रीणीच्या
नात्याने बहरु फुलू लागले

        चारोळी क्र.2

माझी मुलगी माझा अभिमान

कृतार्थ मी जीवनामध्ये झाले
माझी मुलगी माझा अभिमान
संस्काराच्या मुशीतून घडून
करते आजही माझा सम्मान

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Saturday, 14 September 2019

चारोळी ( मर्म जीवनाचे )

स्पर्धेसाठी

चारोळी

मर्म जीवनाचे

जाणून घ्यावे मर्म जीवनाचे
स्वावलंबन अन् स्वकष्टाने
तरच कळते कींमत त्याची
समजून घ्यावे स्वकर्तृत्वाने

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Friday, 13 September 2019

चारोळी ( जीवनगाणे )

स्पर्धेसाठी

चारोळी

जीवनगाणे

घडी घडी बदलत जाते
माणवाचे हे जीवनगाणे
क्षणभंगुर असले जरी
गाती आनंदाने तराणे

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हिंदी कविता ( हिंदी भाषा )

हिंदी भाषा

हिंदी भाषा जनमानसकी
संस्कृतसे जन्मी है तू।
इसलिए तू हमारी भाषा है,
देवनागरी में लिपीबद्ध है तू।

समझेने में आसान है तू,
बोलने में भी सहज है तू ।
भाव अपना प्रकट करते है,
आदानप्रदान की भाषा है तू।

साहित्य भी तेरा प्रचुर मात्रा में
ऊभरी है तू साहित्यिकोंसे
लायी सामाजिक परिस्थिती,
सामने सबके अपनी कलमसे

तू है जैसे माथे की बिंदी,
शोभायमान सबको करती।
लचक है तेरी लिखावट में ,
सुंदर तेरा रुप सलोना दिखाती

राजभाषा का स्थान मिला है,
दिखती सरकारी कागजोंमें।
पढते हैं तुझे बडे चाव से,
बच्चे सारे अपने स्कूलोंमें।

करना संवर्धन तेरा बहना,
काम हमारा जरुरी है ।
नहीं कहेंगे अलविदा तुझको
आगे तुझे हमें बढाना है।

करेंगे प्रसार तेरा दिलसे,
महानता तेरी समझायेंगे।
भारत के साथ दुनियामें,
तेरीही प्रशंसा हम गायेंगे।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Thursday, 12 September 2019

लेख हिंदी भाषा ( हिंदी भाषा )


कोस कोस पर बदले पानी, चार कोस पर वाणी ऐसा कहते हैं कि, पानी का स्वाद कोस कोस पर बदलता है, और चार कोस पर वाणी भी बदल जाती है । भारत देश बहुभाषिक देश है। यहां पर अनेक भाषा बोलने वाले लोग मिल जुल कर रहते हैं। एक दूसरे के विचार, भावना समझ लेते हैं। 14 सितंबर 1949 को संविधान सभा ने हिंदी को राजभाषा के रूप में स्वीकार किया। राज्य भाषा हो या राष्ट्रभाषा, वह कैसी एक भाषा होती है,जो जनसंपर्क की भाषा होती है। ज्यादा से ज्यादा लोग उसे बोलते हैं, समझते हैं,  सरलता से अपने विचार अपनी भावनाएं प्रकट कर सकते हैं। यह सब देखा जाए तो हिंदी ऐसी भाषा है जो बहुत सारे लोग बोलते हैं ,समझते हैं। इतना ही नहीं हिंदी भाषा का साहित्य भी प्रचुर मात्रा में है। नेक ख्यातनाम साहित्यिक जैसे प्रेमचंद, महादेवी वर्मा ,मैथिलीशरण गुप्त, सुभद्रा कुमारी चौहान, संत कबीर, सूरदास जैसे अनेकों संतों ने , साहित्यिकोंने हिंदी भाषा में अपने विचार प्रकट किए हैं। प्रेमचंद्र के अनेक उपन्यासों पर जो सामाजिक आशय से प्रभावित है उन पर फिल्म भी बनाए गए हैं। किसी भी राष्ट्र की पहचान उसके भाषा से होती है, उसकी संस्कृति से होती है। हर एक देश की अपनी भाषा होती है। और यह भी सही है, अगर खुद की उन्नति करना है, विकास करना है, वह अपनी भाषा में ही अच्छी तरह से हो सकता है। अगर हम दूसरी भाषाओं को अपने ऊपर हावी कर देंगे तो हमारा विकास रुक जाएगा। विकास में रुकावट आएगी। अपनी भावना और विचार को  अपनी ही भाषा में ही अच्छी तरह से प्रकट कर सकते हैं। अपनी भाषा को छोड़कर जो दूसरी भाषा को अपनाता है वह उसका गुलाम बन जाता है। क्योंकि हम अपनी भाषा में ही अपने विचार स्पष्ट रूप से प्रकट कर सकते हैं। हिंदी एक ऐसी भाषा है जो पूरे भारतवर्ष में बोली और समझी जा सकती है। हिंदी भारत की माथे की बिंदी है। बिंदी के बिना जैसे चेहरा अच्छा नहीं लगता उसी तरह आशा के बिना भी  देश अच्छा नहीं लगता। भाषा के बिना गूंगे पन का एहसास हो जाता है। हिंदी को राष्ट्रभाषा से अब राज्य भाषा का स्थान प्राप्त हुआ है। हिंदी भाषा का प्रसार और प्रचार करना हमारा , हर भारत वासियों का कर्तव्य है। पाठ्यक्रम से भी  हिंदीभाषा निकाले जाने की भाषा की जा रही है। यह अच्छी बात नहीं है।  इसके लिए हमें प्रयास करना है। और हिंदी भाषा का महत्व बढ़ाना है। अगर हम सच्चे दिल से यह करते हैं तो कोई कठिन बात नहीं है।

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( विसर्जन )

उपक्रम

चारोळी

चारोळी

विषय - विसर्जन

गजाननाचे विसर्जन करताना
रक्षण करु पर्यावरणाचे खास
पाहून प्रदूषण निसर्गाचे आज
सुधारण्याची धरतीला आस

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

हायकू ( मैत्री )

स्पर्धेसाठी

हायकू

विषय - मैत्री

मैत्री आपली
बालपणापासून
सदा हासून

आदर्श आहे
सर्व मैत्रीणीमध्ये
साधण्या साध्ये

दोस्ती म्हणजे
नाते संवेदनाचे
बंध प्रेमाचे

पक्क्या मैत्रीचा
करु पाठपुरावा
नको दुरावा

व्यक्त भावना
निस्वार्थ भावनेने
आत्मीयतेने

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( निरोपाचा क्षण )

उपक्रम

चारोळी

निरोपाचा क्षण

कल्लोळ भावनांचा उठतो
निरोपाचा क्षण आल्यावर
शांतता मिळते मनाला
बांध अश्रूंचा पाझरल्यावर

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Tuesday, 10 September 2019

बडबड गीत ( गणपती )

स्पर्धेसाठी

   बडबड गीत

विषय-  गणपती

आले आले गणपती बाप्पा,
नाचू गाऊ बागडू या.
रोज रोज आनंदाने,
आरती आता गाऊया .

लाडू , मोदक प्रसादाला,
नाही तोटा मौजमजेला.
बाप्पा खूप छान झाले,
सुट्टी मिळाली शाळेला.

दुर्वा ,आघाडा रोज तुला,
शोधून आणतो नियमाने.
बांधून जुडी एकवीसची,
देतो तुला काळजीने.

आरास पाहून तुझी,
जीव आमचा हरकला.
  रोज रोज तुझ्यासमोर,
आवडते आम्हाला नाचायला.

दू:ख एकच बाप्पा मला,
पुराने सारे वाहून गेले.
पावसाला विचार ना रे जरा,
चुकीचे काय असे घडले ?

कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर

सुधाकरी काव्य ( गणेश स्तवन )

स्पर्धेसाठी

सुधाकरी काव्य

गणेश स्तवन

गणपती बाप्पा ।
पार्वती नंदना ।।
करीतो वंदना ।
मनोभावे ।। 1 ।।

तूच त्राता जगी ।
तूच बुद्धी दाता ।।
भक्तीभाव आता ।
तुझ्यापायी ।। 2 ।।

मूषक वाहन ।
त्यावर बैसौणी ।।
जगा गवसणी ।
घालतोस ।। 3 ।।

दुर्वा,आघाड्याची ।
जुडी अर्पितात ।।
गारवा देतात ।
शरीराला ।। 4 ।।

मोदक आवडे ।
गणेशा तुजला ।।
देती पूजनाला ।
भक्तगण ।। 5 ।।

म्हणती तुजला ।
संकट निवारी ।।
समजती खरी ।
महानता ।। 6 ।।

सांभाळी भक्ताला ।
तूच सुखकर्ता ।।
देतसे सुवार्ता ।
सर्वांनाच ।। 7 ।।

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.

Monday, 9 September 2019

चित्रचारोळी ( भेगाळलेले पाय )

चित्रचारोळी

भेगाळलेले पाय

भेगाळलेल्या पायात
कर्मकहाणी उठून दिसते
क्षणभराच्या विश्रांतीनंतर
पुन्हा दारोदार फिरायचे असते

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

चारोळी ( तु माझा सांगाती )

उपक्रम

चारोळी

तु माझा सांगाती

होतास तु माझा सांगाती
देऊन वचने आयुष्यभराची
नियतीलाही कळले नाही
हरवली छाया सौभाग्याची

रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

Wednesday, 4 September 2019

हिंदी कविता ( शिल्पकार )

शिल्पकार

शिल्पकार तू नवयुवकों  का,
  बचपन से ही तू राह दिखाएं
ज्ञान की पोटली खोल के , 
सही गलत की पहचान कराए।

है ज्ञान का भंडार तू ,
जितना दे उतना कम ही है ।
लेने वाला सजग हमेशा ,
ध्यान तुझ पर ही रखना है।

स्थान तेरा अटल है,
स्नेह बंधन तेरा अटूट है।
मांँ बाप के बाद तू ही है,
ब्रह्मा विष्णु महेश का त्रिकूट है।

करते हैं सम्मान सदा से
आदर भावना उमड़ती है।
बिना गुरु के जीवन में,
जीवनधारा ही सिकुडती है।

बिना तेरे सुना ज्ञान का आंँगन,
बिना तेरे नहीं है जीवन ।
करता उज्जवल भविष्यकाल तू,
तू ही है सबका मनभावन ।

प्रणाम तुझको हे गुरुवर ,
आशीष सदा हम पाएंगे ।
जीवनभर हे शिल्पकार तेरा,
  गुनगान सदा ही गाएंगे ।

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

Sunday, 1 September 2019

कविता ( बाप्पाचे मनोगत )

स्पर्धेसाठी

कविता

     बाप्पाचे मनोगत

नाचत होते सर्वजण म्हणत
गणपती बाप्पा मोरया
घरी आणलं एकदा प्रेमाणे
खुष झालो पाहून माया.

आरास खूप छान होती,
मखर फुलांनी सजवलेले.
सजावट पाहून सुखावलो,
डोळे लोकांचे पाणावलेले.

धुवून नेलं महापुराने सारं,
उदासीनता होती पसरलेली.
वाटलं मला परतावं माघारी,
पण भक्तांची भुरळ पडलेली.

म्हणून राहिलो आठ दिवस,
आस्वाद घेत पक्वांनांचा
बदलते स्वरूप पाहून मात्र,
थरकाप उडाला मनाचा.

कान किटले ऐकुन गाणी
शांता , सोनू अन डीजेचा
थकले डोळे पाहुन आता
मर्कट नाच या भक्तांचा .

प्रत्येकजण होता नाचत धुंदीत
नावं माझं अन् गाव त्यांच.
कधी सुधरशील तू मानवा,
विचार कर जगकल्याणाचं.

     रचना
©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर

चारोळी ( माणूस )

स्पर्धेसाठी

चारोळी

विषय -- माणूस

जातियतेच्या पाडून भिंती
माणूस जपतो मानवतेला
धर्मांधतेने जरी पेटवली मने
एकत्र येतो आपत्ती समयाला

रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर