स्पर्धेसाठी
विषय -- भाववाढ
वर्धिष्णू आहे सतत ,
दर भिडलेत गगनाला.
भाववाढ नाडत आहे ,
रोज सर्वसामान्य जनतेला
सरकार येवो कुठलेही ,
सामान्यांची परवडच आहे
भूलथापांना बळी पडून,
भाववाढ माथीच आहे .
माल शेतकरी-याचा रोज,
घेतला जातोय स्वस्ताईत
ग्राहकांच्या पदरात मात्र,
महागाई बनली ताईत .
जगायला तर हवे ईथे,
भाववाढीने जीव जातोय .
मरता पण नाही येत ,
मोह जीवनाचा खुणावतोय
कवयत्री
श्रीमती माणिक नागावे कुरूंदवाड, ता.शिरोळ,
जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment