कविता
खरीप हंगाम
आला हंगाम खरीपाचा ,
लगबग पेरण्यांची झाली.
पावसाच्या आगमनाची ,
प्रतिक्षा सुरू आता झाली.
आला आला पाऊस ,
मन झालं र आनंदी .
शेतकरी राजाच्या ,
झाली जीवाची बेधुंदी .
तू बरस असाच रोज,
बिज अंकुरे खोल मातीत.
कल्पनेतील पीक माझ्या,
बहरू दे हिरव्या शेतीत.
नको आता फास दोरीचा,
माझ्या जीवनी कधीच.
सफळ जाऊ दे खरीप,
जुळणी करेन मी आधीच.
कवयत्री
श्रीमती माणिक नागावे
कुरूंदवाड
No comments:
Post a Comment