लेख क्रमांक 6
विषय- खेळ/क्रीडा
धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मानव हा ताणतणावाखाली वावरत आहे.दररोजचा कामाचा व्याप यामुळे स्वतः कडे वेळ द्यायला वेळच कुणाकडे सापडेना.पण मन:शांती मात्र सगळ्यांना हवी आहे. यावर काय उपाय आहे का?
याला उत्तर आहे , या समस्येवर उपाय आहे. आता तुम्ही म्हणाल की कोणता तो उपाय ? सांगते.. या सगळ्यावर उपाय म्हणजे खेळ खेळणे होय.चकीत झालात ? होऊ नका कारण खेळ हा एकमेव तंदुरुस्ती चा उपाय आहे.खेळ म्हणजे सगळेच मैदानावर, घरात,नियमांत बंदिस्त राहून,मुक्तपणे खेळले जाणारे सगळेच खेळ होय.खेळाचे हे विविध प्रकार आहेत. जगाच्या विविध ठिकाणी विविध प्रकारचे खेळ खेळले जातात.खेळामुळे हे कसं शक्य आहे असे वाटते का ? हो अगदी खरे आहे.
खेळाडू आपला खेळ चांगला व्हावा यासाठी खूप मेहनत घेतात,सराव करतात.खूप त्रास सहन करतात.तेंव्हा कुठे ते यशाच्या जवळ जातात.या खेळाडूंच्या जीवनाकडे पाहिल्यावर आपल्याला प्रेरणा मिळते.,उत्साह येतो.भारतीय खेळ हॉकी,कबड्डी, खो-खो. इ. तर क्रीकेटसारखे परदेशी खेळही भारतात खेळले जातात.आता खेळाडूंना ही शासन शिष्यवृत्ती देत आहे.यामुळे मुलं असो अथवा मुली खे आहे.ळात आनंदाने भाग घेत आहेत. वेटलिफ्टींगसारख्या,कुस्तीसारख्या खेळात मुलीही आता मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत.
अनाथ दिव्यांग खेळाडूंनाही शासनाच्या विविध प्रकारच्या योजन माहिती करुन घेणे क्रमप्राप्त आहे.खेळात खेळताना योग्य समन्वय घालावा लागतो.अंदाज अचूक असावा .याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे हॉकीचे जबरदस्त खेळाडू मेजर ध्यानचंद होय.त्यांना लोकं हॉकीचा जादूगार समजत . गोल करण्याचा त्यांचा परफेक्ट अंदाज होता.सर्वांना वाटे त्यांच्या स्टीकला लोहचुंबक लागले आहे की काय.तशी तपासणी ही झाली. त्याचप्रमाणे क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सनी म्हणजेच सचिन तेंडुलकर होय.अनेक विक्रम त्यांच्या नावावर नोंद आहेत. हे सगळं आपोआप नाही आले.तर त्या पाठीमागे त्याची मेहनत आहे.आज त्याचा वाढदिवस आहे.संपूर्ण जगातील लोक आज त्याला शुभेच्छा देत आहेत.
खेळामुळे अंगात उर्जा निर्माण होते.मन शांत होते.ताण सगळा निघून जातो. मनी सकारात्मक विचार येतात.ताजेतवाने वाटते.आमच्या लहानपणी शाळेतून आल्यानंतर आम्ही एक तखस खेळ खेळत असू.मग हातपाय धुवून अभ्यासाला बसायचो. त्यामुळे अभ्यास कधी कंटाळवाणा वापलाच नाही. कधी आळस आला नाही. आता खेळ ही संकल्पना बदलण चालली आहे. खेळ आजची मुले खेळ खेळतात पण मैदानावर नाही तर मोबाईल, कम्प्युटरवर खेळतात. तासंतास एकाजागी बसून वेळ घालवतात.पण याचा काहीच उपयोग नाही तर उलट नुकसानच आहे.एकाजागी बसल्यामुळे उर्जा खर्च होत नाही. शिवाय नजरेवर वाईट परिणाम होतात.
आरोग्य ही धनसंपदा मानली जाते. पण त्यासाठी आपण व्यायाम, योगासने, प्राणायामची जोड खेळाबरोबर द्यायला हवी.निरोगी शरीरात निरोगी मन वास करते असे म्हणतात.हे खरेही आहे. त्यासाठी आपण खेळले पाहिजे. जीवनात खेळाला महत्त्व दिले पाहिजे.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment