स्पर्धेसाठी
कविता
विषय- कर्तव्याची दोरी
आज कळे मानवाला,
त्याच्या कर्तव्याची दोरी.
नाही उपयोग काही,
किती केली शिरजोरी.
राखू स्वच्छता घरीदारी,
शाकाहार महत्त्वाचा.
प्रेम प्राण्यांवर करा,
नको विचार खाण्याचा.
देशहीत राखण्यास,
राहू सदैव तयार.
देऊ सहकार्य त्यांना,
नको त्रस्त न बेजार.
बाणा स्वाभिमानी राखू,
दक्ष कर्मचारी सारे.
प्रेमभावे सहकार्य,
जागवून प्रितवारे.
जगी वंद्य भारतीय,
संस्कृतीचा अभिमान.
राखण्यास बाध्य आम्ही,
उंच राखू स्वाभिमान.
दोरी कर्तव्याची आहे,
मजबूत, बाणेदार.
पराजय ना मंजूर,
आम्हा आम्ही ठाणेदार.
कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment