अलक
ती
ती...रस्त्यावर बेवारस फीरत होती.कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. भाषा कळत नव्हती." मुलं,मुली नाहीत का ? "उत्तर आले,"आहेत , तिकडे गावाकडे .चांगले मीळवतात." "जाणार का तिकडे" उत्तराच्या ऐवजी उदासीनता दिसली." निदान वृद्धाश्रमात तरी सोडते!! " तिच्या चेहऱ्यावर अविश्वास, जणू सांगत होता ," या जगात विश्वास तरी कुणावर ठेऊ ?" मी निरुत्तर...
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड
No comments:
Post a Comment