Thursday, 30 April 2020

कविता अष्टाक्षरी( सावराया हवे आता )

अष्टाक्षरी

विषय- सावराया हवे आता

शिर्षक- निसर्गाचा कोप

निसर्गाचा कोप झाला,
सर्वत्रच हाहाकार.
सामसूम दाही दिशा,
सगळेच निराकार.

बंद झाले सर्वकाही,
हाल गरीबांचे झाले.
पोटासाठी वणवण,
कर्म सर्वांना भोवले.

दंभ विज्ञानाचा खुजा,
अहं मानवाचा खोटा.
आत्मप्रौढी बिनकामी,
उपयोगी नाही नोटा.

देव सारे बंद झाले,
भक्त शोधी कुठे त्राता.
आपल्याच मना सांगा,
सावराया हवे आता.

मदतीला धावणारे,
हात सेवकांचे पुजू.
ऋणाईत सदा राहू,
कायमच असू रुजू

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment