Wednesday, 8 April 2020

मुलाखत (माझा परिचय )

माझा थोडक्यात परिचय


*१) आपले संपूर्ण नाव*

श्रीमती माणिक कल्लाप्पा नागावे

*२)आपले गाव,शहर याविषयी ....... काही विशेष असल्यास त्याबद्दल थोडक्यात......*

रा.कुरुंदवाड, 
सध्या- जयसिंगपूर, 
ता. शिरोळ,जिल्हा. कोल्हापूर
कुरुंदवाड ला संस्थानकालीन कृष्णा घाट आहे.अतिशय सुंदर परीसर आहे.या घाटावर साने गुरुजींनी भाषण केले होते.महात्मा गांधीजींच्या रक्षेचे विसर्जन येथे केले आहे.दरवर्षी बारा फेब्रुवारी ला इथे त्या स्मरणार्थ कार्यक्रम घेतला जातो.तसे इथे प्राचीन संस्थानकालीन विष्णुमंदीर आहे.कोरीव काम अप्रतिम आहे. कुरुंदवाड गावची बासुंदी खवा पेढे व कृष्णाकाठची वांगी प्रसिद्ध आहेत. सर्कशीचे जनक पं. विष्णुपंत मोरेश्वर छत्रे साहेब,शास्त्रीय संगीतकार पं.विष्णु दिगंबर पलुसकर यांचा जन्म कुरुंदवाडला झाला. राष्ट्र सेवादलाचे क्रियाशिल केंद्र.

*३) साहित्य लेखनात आपण केव्हापासून आलात?*

साहित्य लेखनात तीस वर्षापूर्वी हायस्कूलमध्ये असतानाच झाली.

*४)साहित्य क्षेत्रात आपण कसे आलात आणि याची आवड कशी निर्माण झाली?*

राष्ट्र सेवादलाच्या विचाराने चालणारे आमचे वडील होते.त्यामुळे अनेक विचारवंत बौद्धिक घ्यायला यायचे. आमच्या घरीही ते जेवायला, वस्तीला असायचे.तेंव्हा त्यांच्या संपर्कात आल्यामुळे व त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मला वाचनाची आवड लागली.शिवाय माझे वडील लेख , कविता लिहायचे ते पाहून मलाही प्रेरणा मिळत असे.मीही शाळेतील वक्तृत्व व निबंध स्पर्धेत भाग घ्यायची व वाचून स्वतः भाषण ,निबंध तयार करायची व स्पर्धेत भाग घ्यायची.कॉलेजमध्ये असताना भित्तिपत्रकामध्ये, मासिकामध्ये लिहायला सुरवात केली,ती आजतागायत.

*५)आपले काही साहित्य प्रकाशित झाले आहे का?असल्यास त्याबद्दल थोडक्यात.....*

माझा एक कवितासंग्रह-
            भावतरंग
दोन चरीत्र संग्रह--
1) समतेचे पुजारी- एस.एम.
                               जोशी
2) चारीत्र्य चक्रवर्ती- शांतिसागर महाराज   

शिवाय विविध मासिकामध्ये, दिवाळी अंकांमध्ये, वृत्तपत्रात
विविध विषयांवर लेख,कथा, कविता ,समीक्षणं प्रकाशित झाले आहेत.
           

*६)साहित्य लेखनात आवडता काव्यप्रकार कोणता?*

साहित्य लेखनात आवडता प्रकार कविता, चारोळ्या लिहणे हा आवडता प्रकार आहे.

*७)आपली सर्वात आवडती रचना कोणती आणि ती आपण येथे पाठवावी*

माझी सर्वात आवडती रचना 
" सय माहेराची " ही अष्टाक्षरी रचना होय.

विषय - सय माहेराची

सय माहेराची येता ,
जीव कासावीस होतो.
माय माझी बोलावते,
गांव मज आठवतो.

जन्म घेतला ऊदरी,
पांग कसे फेडायाचे.
ऋण नाही फिटणारं
कीती जन्म घालायाचे?

प्रेम माझ्या भावंडाचे ,
डोळा आणतयं पाणी .
सय माहेराची येता ,
ओठी स्फुरतात गाणी .

बाबा माझे मुर्तीमंत 
रुप देवाचे दिसते .
नमस्कार चरणी या ,
आशीर्वाद सदा घेते .

सय माहेराची माझ्या ,
आहे सोबतच माझ्या .
साद घालते आईला ,
म्हणे अंतरीच तुझ्या .

कीती आठवू तुम्हाला ,
मन नाही हो भरत .
पाण्यावीण मासा जगी ,
नाही मला हो स्मरत .

अशी सय माहेराची ,
सर्व लेकींनाच येते .
गेली नाही आईकडे ,
तरी मनानेच जाते.

कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापू

*८)साहित्य क्षेत्रातील आपले आदर्श कोणते?त्यांच्याबद्दल थोडक्यात.....*

साहित्य क्षेत्रातील माझे आदर्श म्हणजे साने गुरुजी, सुधा मुर्ती आहेत.

साने गुरुजींनी शामची आई या पुस्तकातून आपल्या आईला उच्च स्थानी नेऊन ठेवले.व सर्व जगाला दाखवून दिले की आई- संस्काराची खाण कशी असते.फक्त आणि फक्त आईमुळेच ते कसे घडले हे साऱ्या जगाला दाखवून दिले.आज अजूनही साऱ्या जगात साने गुरुजींचे शामची आई हे पुस्तक प्रसिद्ध आहे. विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला आहे.चित्रपट ही निघाला आहे.कीतीही कठोर  हृदयाचा माणूस असला तरीही तो हे पुस्तक वाचताना रडलाच पाहिजे. एवढी ताकत साने गुरुजींच्या लेखणीत आहे.साने गुरुजींची धडपडणारी मुले,मोरी गाय,कथा दारुबंदीच्या,इ. अनेक प्रकारचे लेखन मनाला भावते,भिडते.

सुधा मुर्तींचे वाईज अदरवाईज,हरवलेल्या मंदिराचे रहस्य,महाश्वेता इ.साहित्य प्रसिद्ध आहे. या लेखिका काल्पनिक न लिहता आयुष्यात घडलेल्या घटनांचे वर्णन आपल्या लेखनात करतात.त्यामुळे वाचताना ते मनात घर करतात.

साने गुरुजी व सुधा मुर्ती यांचा साधेपणा,सच्चेपणा, व वैचारीक प्रगल्भता मला आवडते.


*९)भविष्यात आपणास कोणकोणते काव्यप्रकार  शिकायला आवडतील?*

भविष्यात मला गझल हा प्रकार शिकायला खूप आवडेल.

*१०) अव्यक्त अबोली साहित्य परिवराबद्दल आपले थोडक्यात मत व्यक्त करा?*

अव्यक्त अबोली या साहित्य समुहात साहित्यातील अनेक प्रकार हाताळले जातात. नवोदितांना प्रोत्साहन मिळते.आपल्या कल्पना शक्तीला इथे फार मोठा वाव आहे.विशेष म्हणजे इथे वाद होत नाहीत. सर्वांशी सलोख्याने वागले,व वागवले जाते.मी कुणीतरी आहे, माझेच सर्वांनी ऐकायला पाहिजे ही भुमिका नसते.

*११) आपल्या समूहात असलेल्या अडचणी,कमी,चुका कोणत्या?किंवा कोणते नवे बदल आपणास आवश्यक वाटतात......*

अडचणी,कमी,चुका काही नाहीत.
नवीन बदल म्हणजे गझलेसंबंधी एक ऑनलाइन कार्यशाळा घ्यावी.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड. ता.शिरोळ,जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment