Sunday, 5 April 2020

कविता ( चिमणी पाखरं )

स्पर्धेसाठी

कविता

विषय- चिमणी पाखरं


थांबले जग हे सारे अचानक,
बंद व्यवहार अन् कारखाने.
प्रदुषण करण्या नाही कोणी,
चिमणी पाखरे गाती आनंदाने

चिवचिवाट पहाटे ऐकू येता,
जाग आली तृप्त कान झाले.
भास्कराच्या प्रकाशातून ,
खग आनंदाने विहरु लागले.

मुक्त संचार नव्हता केला,
सारी गर्दी पाहून भेदरलेले.
प्रदुषणाच्या कराल कवेतून,
सुटण्या सारे फडफडलेले.

कीती शांतता अनुभवली ही,
जणू राज्य आमचेच आले.
मानव सारा बंदिस्त घरातून,
नकळत बदल सारे झाले.

कोकीळ कुहूकुहू आलाप घेते
राघूमैना ठुमकत रिझवी मना.
मोर नाचरा,फुलवीतो पिसारा,
सारे पक्षी सोडून आले वना.

कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530

No comments:

Post a Comment