Tuesday, 28 April 2020

लेख ( शाळेतील गमतीजमती )

लेख
शाळेतील गमतीजमती

लहानपण देगा देवा,
मुंगी साखरेचा रवा 
असे बालपणाविषयी बोलले जाते.लहानपण सर्वांना आवडते.त्याचप्रमाणे शाळा आहे.आपण मोठे होतो.पण शाळेच्या आठवणी नेहमीच ताज्या असतात.
मला माझी शाळा मनापासून आवडते.लहानपणी मी कन्या विद्या मंदिर नं.१ मध्ये शिकत होते.इयत्ता पहिली ते सातवी आम्ही बालमैत्रीणींनी खूप मजा केली.ते दिइआजहघ आठवले की मन हर्षोल्हासित होऊन नाचू लागते. माझ्या वर्ग शिक्षिका सौ.डिग्रजे बाई होत्या.तेंव्हा आम्ही बाईच म्हणायचो.कीती गोडवा आह त्या शब्दात!!! आम्ही पाचसहा जणांचा एक ग्रुप होता.मी बाईंच्या मैत्रीणीची मुलगी म्हणून असेल,कींवा थोडी हुषार, आगाऊ जास्त असल्याने असेल माझ्यावर बाईंचे सतत लक्ष असे.त्यामुळे आपसूकच बाकीच्या मुलींही माझ्या भोवती भोवती असत.आम्ही वेगवेगळ्या खेळात तरबेज होतो.सर्व स्पर्धांत भाग घ्यायचो.एकमेकांच्या घरी जाऊन दंगामस्ती करायचो,पालकांचा काव खायचो,पण काही बदल होत नव्हता.

शाळेत गरीब मुलीही होत्या. कधीतरी त्यांना परीस्थिती मुळे काही वस्तू मिळायच्या नाहीत. त्यावेळी आमच्या ग्रुपतर्फे त्यांना आम्ही थोडे थोडे पैसे काढून त्यांना हवी असलेली वस्तू कींवा फी भरायला मदत करायचो.तेंव्हा खूप छान वाटायचे.मग त्यापण आमच्या खेळात सामिल व्हायच्या.सातवीनंतर आठवघ ते दहावीला हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. मग आमचा दंगा काय विचारता. खेळाच्या तासाची आम्ही आतुरतेने वाट पहायचो.एकदा का बेल झाली की सुसाट मैदानावर... कायकाय कीती खेळ खेळायचो ..बापरे..एक तर असा होता, आमच्या शाळेच्या मैदानावर ट्रक्टरची ट्राली उभी असायची.पाठशिवीचा खेळ त्यावर आम्ही खेळायचो.एकटी पाठ लागली की बाकीच्या पळायचो.फक्त पळायचो नाही तर त्या ट्रक्टरच्या वर चढायचो.मैत्रीण शिवायला आली की लगेच दुसऱ्या बाजूने उतरून ट्रक्टरच्या खालच्या बाजूने परत वर चढायचो.तेही अगदी लिलया.कसं जमतं होतं कुणास ठाऊक.

कुणीतरी एखादी वस्तू आणली तर सर्वजण त्याचा उपयोग करायचो.एखादे नवीन फळ आणले कुणीतरी तर चिमणीच्या दातांनी सर्वजण कुरतडायचो.आता कीळस वाटते ना ? पण तेंव्हा असले भाव मनातच येत नव्हते. अगदी निरागसतेने हे सर्व चाललेले असायचे. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की कघ मीळेपर्यंत आम्ही गप्प बसत नव्हतो.वर्गात विद्यार्थीनी प्रतिनिधी मीच असल्याने मी सांगेल तेत बाकीच्या करायच्या अर्थात आवडीने.हं !! मी कधीच कुणावरही कुठल्याही गोष्टींची जबरदस्ती केली नाही. सगळे गोडीगुलाबीने रहात असू.
शाळेत असताना सर्व खेळ खोखो,कबड्डी, लपाछपी, शिवाशिवी, कींवा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम असूदे सर्वात सहभागी होत असू.एकदा " सुंदर ते ध्यान, उभे वीटेवरी" हा डान्स आम्ही बसवला होता.प्रत्यक्ष स्टेजवर आम्ही वारकरी, पांडुरंग इ.ची वेशभूषा करुन तल्लीन होउन नाचत होतो.तेंव्हा एक बाई स्टेजवर येउन पांडुरंगाच्या व आमच्या पाया पडून गेली.खूप छान वाटले तेंव्हा.टाळ्यांचा गजर अजून मला ऐकू येतो.

एक दिवस भाषण करायचे होते.मी पाठ केले नव्हते.शिक्षिकांनी माझे नांव पुकारले. मी म्हटलं, " माझं पाठांतर झाले नाही." त्या म्हणाल्या, " कख नि केलं? जेवढं केलयं तेवढं तरी बोल,उठ " मी उठले स्टेजवर गेले पण भाषण काही आठवेना. सुरवात केली.सगळ्यांची नावं घेऊन झाली. पण पुढे काय ? मला एक शब्द आठवेना. मराठी भाषा सोडून कन्नड ,इंग्रजी भाषा आठवायला लागल्या. रडू येतयं का काय असं वाटत होतं.शेवटी शिक्षिकेंनी रागानेच ये खाली म्हटल्यावरच सुटका झाली. तेंव्हापासून आजपर्यंत तसा अनुभव कधीच आला नाही कारण मी आधी तयारी करायची असते हे लक्षात ठेवले होते.

पण आता ते शक्य नाही. फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी एवढचं म्हणू शकतो.व पुन्हा बालपणात रमून जाऊ शकतो.खरंच रम्य होते बालपण .बालपणातील शाळा व शाळेतल्या आठवणी, गमतीजमती.

लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

No comments:

Post a Comment