उपक्रम
काव्यलेखन
विषय-- मला पडलेला प्रश्न
वावरती अजूनही बिनघोर,
हे समाजकंटक समाजात.
प्रश्न मला पडला खरोखर,
भिती दाटली काळजात.
असता संचारबंदी कडक,
तोडून निर्बंध मस्तवालपणे.
वावरतात जणू तो वळू,
करावी कारवाई कठोरपणे.
सांगता वाजवायला टाळी,
घुसखोरांसारखा झाला दंगा.
नव्हते माहीत अडाण्यांना,
घेताहेत ते कुणाशी पंगा.
दिपक लावण्यावरुनही चर्चा,
घनघोर वादविवादात जनता.
करुन कानाडोळा हेतुपुरस्सर,
दिसली कुचकामी महानता.
पसरतो संसर्ग सानिध्याने,
जाणूनही हरताळ फासला.
का वाढवतात ही मुर्ख माणसे
मनातला प्रश्न मनातच राहिला
कधी होतील शहाणे बांधव,
काय शिकवणार मुलांना ?
स्थिरता नसेल तुमच्या अंगी,
आदर्श कुणाचा चिमुकल्यांना?
कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment