लेख
नशीब
" माझं नशिबचं फुटकं , कयम मी अशीच चडफडत राहणार." " नाही रे , माझं ना नशिबच बेकार आहे,मी असाच राहणार कायम ", " मी कीतीही अभ्यास केला ना तरीही मला पेपर अवघडचं जातो,माझं नशिबच असलं आहे "अशी अनेक वाक्ये आपण समाजात नेहमी ऐकत असतो.यावर मी नेहमी विचार करत असते.हे खरं असेलं का? माझ्यामते ही एक पळवाट आहे.
जीवन जगताना रोज सगळे चांगलच होईल ही अपेक्षा आपण गृहीत धरून कृती करत असतो.कोणत्याही गोष्टीचा शेवट हा चांगला की वाईट हे कशावरून ठरते? आपल्या कृतीवर ते अवलंबून असते.आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर यश निश्चितच मिळते.काम करत असताना ध्येय न ठरवता जर जनावरांसारखे फक्त राबतच राहिलो तर दिशाहीन तारुसारखी आपली अवस्था होते व आपण भरकटतच राहतो.व शेवटी अपयशाला सामोरे जावे लागते.व आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो.नशिबाला दोष देणे म्हणजे अप्रत्यक्षपणे स्वतःची सुटका करुन घेणे होय.स्वतःचा नाकर्तेपणा झाकून टाकायचा असेल तर नशिबाचा हवाला देणे होय.
काही लोकं नशीब म्हणजे त्यांचे पूर्वजन्मातील पाप-पुण्य समजतात.नशीब घडवायचे असेल तर ते आपल्या हातात आहे असे मला वाटते.आपले नशीब आपण कसे काय घडवू शकतो? असे तुम्हाला वाटेल.पण ते खरेच आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या मन,मनगट,व मेंदूवर विश्वास हवा.तरच कोणतीही जबाबदारी आपण लिलया पेलू शकतो.अपयश आले तर आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे लगेच आपल्या लक्षात येते व पुढच्या वेळी ती चुक सुधारुन आपण यशस्वी होतो.
विद्यार्थ्यांनी जर वेळच्यावेळी लक्षपूर्वक अभ्यास पूर्ण केला तर साहजिकच त्यांना परीक्षेत धवल यश संपादन होते.यात कुठेही नशिबाचा, दैवाचा भाग येत नाही." कर नाही त्याला डर कशाला " अशी गत प्रयत्नशील व्यक्तीची होते." प्रयत्नांती परमेश्वर" हे ही तेवढेच खरे आहे." प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे " या उक्तीप्रमाणे दैवाचा,नशिबाचा भाग येथे गौणच आहे.म्हणून सर्वांनी नशिब , नशिब न म्हणता प्रयत्न, प्रयत्न म्हटले पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना एका एका सेंकदासाठी आपले नंबर गमवावे लागतात.प्रयत्न थोडेसेच कमी पडलेले असतात.हे सकारात्मक विचार करणारा खेळाडूच स्विकारु शकतो. नाहीतर बाकीचे नशिब म्हणत बसतात.
एखादी व्यक्ती आयुष्यात सफल होते.एखाद्या बाईचा संसार सुखाचा होतो.कुणाला वाईट अनुभव येतात.कुणी अयशस्वी होते.अशावेळी आपण यशस्वी लोकांना भेटून त्यांचे जीवन जवळून पाहिले तर आपल्याला ही आशेचा कीरण दिसतो.तेंव्हा कधीही निराश होऊ नका.प्रयत्न करा व यश मिळवा.सर्व संतानीही आपल्याला हेच सांगितले आहे.सर्व शास्त्रज्ञ जर नशिब, दैव करत बसले असते तर इतके शोध लागले नसते.अश्मयुगातच मानव खितपत पडला असता.वेळेचा सदुपयोग करुन घ्या.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment