Monday, 9 April 2018

लेख ( चला मानवतेचा मंत्र जपूया )

स्पर्धेसाठी

लेख -      चला मानवतेचा मंत्र जपूया

मानवता कीती महान शब्द . या शब्दातच कीती वजन आहे . मानवतेसाठी अनेक थोर विचारवंतांनी , संतांनी , समाजसुधारकांनी अथक प्रयत्न केले आहेत , व करतही आहेत.मानवता म्हणजे एकमेकांच्या बद्दल असलेला प्रेमभाव , सहसंवेदना , सहानुभूती    होय . मानवता म्हणजे विनाकलह गुण्यागोविंदाने एकत्र राहणे होय .

आज दहशतवादी संघटना आणि समाजविघातक लोक दंगाधोपा , दंगल माजवून सामाजिक ऐक्य व शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशावेळी भारतीय जनतेची मानवता आपल्याला दिसून येते.अनेक मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मानवतेचा संदेश लोकांपर्यंत जातो

मानवतेचा मंत्र जपण्यासाठी आपण सर्व एकत्र येण्याची गरज आहे.आजपर्यंत आपण जसे वागलो तसेच वागूया व परकीय व दहशतवादी कारवायांना दूर सारून भारतीय जनतेला शांत वातावरण निर्माण करुन देऊया .

जयहिंद.

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.

No comments:

Post a Comment