स्पर्धेसाठी
लेख - चला मानवतेचा मंत्र जपूया
मानवता कीती महान शब्द . या शब्दातच कीती वजन आहे . मानवतेसाठी अनेक थोर विचारवंतांनी , संतांनी , समाजसुधारकांनी अथक प्रयत्न केले आहेत , व करतही आहेत.मानवता म्हणजे एकमेकांच्या बद्दल असलेला प्रेमभाव , सहसंवेदना , सहानुभूती होय . मानवता म्हणजे विनाकलह गुण्यागोविंदाने एकत्र राहणे होय .
आज दहशतवादी संघटना आणि समाजविघातक लोक दंगाधोपा , दंगल माजवून सामाजिक ऐक्य व शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशावेळी भारतीय जनतेची मानवता आपल्याला दिसून येते.अनेक मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मानवतेचा संदेश लोकांपर्यंत जातो
मानवतेचा मंत्र जपण्यासाठी आपण सर्व एकत्र येण्याची गरज आहे.आजपर्यंत आपण जसे वागलो तसेच वागूया व परकीय व दहशतवादी कारवायांना दूर सारून भारतीय जनतेला शांत वातावरण निर्माण करुन देऊया .
जयहिंद.
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment