स्पर्धेसाठी
विषय - गरज पुस्तकांची
अज्ञानाच्या अंधःकारातून ,
ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्यास.
गरज आहे पुस्तकांची खास ,
जीवनमार्ग विकासाकडे नेण्यास.
पुस्तकच घडवतात मस्तक ,
सारासार विचार जागवतात .
संघर्षाच्या या दुनियेत ,
रस्ता यशाचा दाखवतात.
पुस्तकच आहेत खरे मित्र ,
एकाकीपणा आपला घालवतात.
दुःखात सुद्धा सुखाच्या ,
राजमार्गाचा दरवाजा उघडतात.
पुस्तकच आहेत मार्गदर्शक ,
विवेकबुद्धी जागृत ठेवतात .
नैतिकतेच्या झुल्यावर ,
अलवारपणे झुलवतात .
पुस्तकच आहेत आपला आरसा ,
मनातील भावनांच्या प्रतिबिंबांचा
गोंधळलेल्या मनावरील आवरण ,
बाजूला करणाऱ्या विचारांचा .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment