स्पर्धेसाठी
कविता ( विद्रोही )
विषय - राजनीती
गेला जमाना सत्ययुगाचा ,
कलियुगाचेच राज्य पसरले.
ज्याची त्याची ठरली राजनीती,
कुणी कधी वचना जागले ?
पाचवर्षातून एकदाच फीरतात,
जत्थेच ईथे राजकारण्यांचे.
बाकी नसते सवड कुणाला ,
वेड फक्त खुर्ची टिकवण्याचे.
काय म्हणून जनता भोळी,
पडती बळी आश्वासनांसाठी.
लाचार होऊन पैसे खाती,
आत्मसन्मान गहाण मतांसाठी.
कोणत्या तोंडी जाब विचारणार ?
ऊत्तरे ठरलेलीच दिली जातात.
असल्या जगण्यापेक्षा मतदारा,
नोटाचं शस्त्र घे हाती मतदानात.
ऊतरवला पाहिजे माज यांचा,
सत्तेची चढलीय खूप नशा.
गरीबांची कींमत नाही केली तर,
सहजच पाडतील आता फडशा.
जागा हो मानवा तूच तूझा त्राता,
बदलून टाक समाजव्यवस्था.
सगळेच झालेत संधीसाधू चोर,
हो तय्यार बदलण्या ही अवस्था.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment