साहित्य स्पंदन समूह
लेख स्पर्धा 28/10/2018
विषय - मी टू ..ची मोहीम
आज सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये हमखास दिसणारा शब्द म्हणजे मी टू... होय.मी टू... चा शब्दशः अर्थ होतो मी सुध्दा . आज ज्या विषयासंदर्भात जोरदार चर्चा चालू आहे त्यावरून असे लक्षात येते की हे सर्व प्रकरण स्री व स्रीत्वासंबंधी आहे. ही चळवळ सुरू करण्यापाठीमागे एक चांगला व उदात्त हेतू दिसून येतो.9 डीसेंबर 2013 ला कायदा संमत झाला असला तरी ऑक्टोबर 17 ला हॉलीवूड मध्ये कामाच्या ठिकाणी होत असलेल्या यौन शोषणाविरुद्ध आवाज ऊठवण्याकरीता अमेरिकन अभिनेत्री एलिसा मिलानो ने महिलांना प्रोत्साहित केले. या कायद्यात महिला तिच्यावर झालेल्या अत्याचारासंदर्भात नव्वद दिवसात तक्रार करायची आहे. नंतर परत नव्वद दिवसासाठी कारणे सांगून वेळ परत नव्वद दिवसांचा कालावधी मागून घेता येतो.त्याचप्रमाणे घटनेनंतर एक ते तीन वर्षापर्यंत तक्रार करता येते.
अशाप्रकारे मीटू... महिलांना एक आधार मिळाला. ही एक चांगली सुरवात आहे. पण मध्ये एवढी वर्षे निघून गेली व अचानकपणे हा विषय चर्चेत आला. प्रत्येकजण यावर आपली मते मांडू लागले. तनुश्री दत्ता व नाना पाटेकर सारख्या दिग्गज कलाकाराचे नांव पुढे आल्यावर सगळ्यांचे लक्ष वेधले गेले.या गोष्टी मनात न पटणाऱ्या आहेत. कारण नाना पाटेकर चे कार्य पाहता सर्वांना ते अनाकलनीय होते.हळूहळू एकेक प्रतिष्ठित व्यक्तींची नांवे पुढे येऊ लागली.मनात मग शंकेची पाल चुकचुकली. हे सर्व आत्ता असे अचानक कसे काय.घटना पाहता ती वीस पंचवीस वर्षापूर्वी ची असल्याचे बोबले जाते. मग ईतके दिवस या गप्प का होत्या. तेव्हाच का विरोध दर्शवला नाही ? तेव्हा तुम्ही समायोजन केलंत . चित्रपटात काम व नांव ,पैसा प्रसिद्धी मिळवली.व आज यातलं काही राहीलं नाही म्हणून की काय ही ऊपरती आली ? तेव्हा तुम्हाला नको होते ना मग पुढे पाऊल का टाकायचे ? तिथूनच माघार घ्यायची होती? तेव्हा हे का सुचले नाही. तुम्हाला कुणी जबरदस्ती केली होती का की नाही तुम्हाला हेच काम करायचे आहे म्हणून? त्यावेळी तूम्ही ते नाकारायचे व दुसरा मार्ग निवडायचा. हे सर्व प्रश्न मनात आले व मन विचार करु लागले. यातलं खरं कीतपत व खोटं कीतपत आहे.
महिलांच्या दृष्टीने हे अत्यंत चांगले व सुरक्षा देणारे व स्त्रीची हीम्मत वाढवणारे आहे. याचा फायदा महिलांनी जरूर घ्यावा पण योग्य कारणांसाठी. याचा गैरवापर न करता आपल्या हक्कासाठी करावा.गैरसमजुतीमुळे व एखाद्याबद्दलचा आकस मनात धरुन गैरवापर करु नये.यामध्ये आपली अब्रू तर जातेच जाते व ज्या व्यक्तीवर आपण शिंतोडे उडवतो त्याचीही बदनामी होते.दोघांनाही ते नुकसानीचेच आहे.एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर आता हे परत कुठल्याही पुराव्याशिवाय आरोप लावणे हे बिनबुडाच्या घागरीसारखे होईल.एवढ्या वर्षांचा पुरावा कीतपत खरा असेल? त्यात फेरफार केला नसेल कशावरून ? अशा नाना शंका मनात येतात.याची सर्व ऊत्तरे ठामपणे देता येत असतील तरच एक पाऊल पुढे टाकलेले बरे.अन्यथा आपला आरोपीचा व न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्यासारखे होणार आहे. तेंव्हा आता सद्यस्थितीत महिलांच्या वर होणाऱ्या अनेक मनाला चीड आणणाऱ्या घटना घडत आहेत.काही विकृत मनोवृत्तीच्या लोकांमुळे सर्वांच्याच कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.या मनोवृत्तीला पायबंद हा बसलाच पाहिजे. सर्व महिलांनी याचा योग्य वापर करुन आपले मत मांडायला निर्भयपणे पुढे यावं हीच सदिच्छा.
लेखिका
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर
9881862530