स्पर्धेसाठी
कवितास्पर्धा
विषय - दिप उजळूया प्रेमाचे
पारखा झालाय मानव ,
सुखाच्या चार शब्दाला .
दिप उजळूया प्रेमाचे ,
शांतता लाभूदे मनाला .
आधुनिकतेचा लेऊन बाज ,
तरुणाई बेभाण वावरते .
दिप उजळूया प्रेमाचे ,
घालू संस्कृतीचे बंध ते .
संवेदनारहीत माणुसकीची ,
उघडूया बंद कवाडे आज .
दिप उजळूया प्रेमाचे ,
दाखवूया भावनांचा बाज .
भावी पिढी उभारण्यासाठी ,
गुंफु माळ मुल्य विचारांची .
दिप उजळूया प्रेमाचे गरज, सुजाण नागरिक घडण्याची.
संस्काराचा दिप दारी लावू
धुंद मानसिकता आवरायला
दिप उजळूया प्रेमाचे ,
सुंदर भारत घडवायला .
✍ कवयित्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment