Sunday, 4 February 2018

माणुसकी हरवली

स्पर्धेसाठी

       अष्टाक्षरी काव्यस्पर्धा

विषय - माणुसकी हरवली

आजकाल या जगात ,
माणुसकी हरवली .
सगळेच म्हणतात ,
संवेदना गमावली .

दररोज पडतात ,
खून इथे बांधवांचे .
भारतीय आम्ही एक ,
मोल ना या आसवांचे .

बंद ,दंगा , मारामारी ,
रोज होतो संप पहा .
पेटवली  ज्योत कुणी ?
लक्ष ते देऊन पहा .

बलात्कार होतातच ,
असो बालिका , तरुणी .
नाती संपवली त्यांनी ,
वासनांध नजरांनी

थांबणार आहे का हे ,
सत्र अमानवतेचे ?
येऊ द्या या पुन्हा जगी ,
रंग हो मानवतेचे .

   कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .

No comments:

Post a Comment