स्पर्धेसाठी
अष्टाक्षरी काव्यस्पर्धा
विषय - माणुसकी हरवली
आजकाल या जगात ,
माणुसकी हरवली .
सगळेच म्हणतात ,
संवेदना गमावली .
दररोज पडतात ,
खून इथे बांधवांचे .
भारतीय आम्ही एक ,
मोल ना या आसवांचे .
बंद ,दंगा , मारामारी ,
रोज होतो संप पहा .
पेटवली ज्योत कुणी ?
लक्ष ते देऊन पहा .
बलात्कार होतातच ,
असो बालिका , तरुणी .
नाती संपवली त्यांनी ,
वासनांध नजरांनी
थांबणार आहे का हे ,
सत्र अमानवतेचे ?
येऊ द्या या पुन्हा जगी ,
रंग हो मानवतेचे .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
No comments:
Post a Comment