Friday, 9 June 2017

विरह

स्पर्धेसाठी

  काव्यस्पर्धेसाठी - विरह

राजमनीचे अधरी येता ,
      काया ही बावरते .
थरथर तनुची पाहता ,
    आपसूकच ते लाजते .

तू जवळ नसतानाही ,
तुझ्या आठवणींचा सहवास
गहिवरल्या मिठीत माझ्या ,
तुझ्या सोबतीचा भास .

असाच मनीचा भाव ,
तुझा नी माझा राहुदे .
साथ तुझी , त्या भावना,
सदैव मनात असूदे .

प्रीत माझी शोधते तू कुठे ,
  मन ते बेचैन होते .
वाट आयुष्याची बिकट ,
   तरीही मी चालते .

सहवास जरी अल्पसा ,
     मिळाला मजला .
कोंदणात मनाच्या तो ,
     कायमच वसला .

✍ कवयीत्री ✍

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106

No comments:

Post a Comment