स्पर्धेसाठी
काव्यस्पर्धेसाठी - विरह
राजमनीचे अधरी येता ,
काया ही बावरते .
थरथर तनुची पाहता ,
आपसूकच ते लाजते .
तू जवळ नसतानाही ,
तुझ्या आठवणींचा सहवास
गहिवरल्या मिठीत माझ्या ,
तुझ्या सोबतीचा भास .
असाच मनीचा भाव ,
तुझा नी माझा राहुदे .
साथ तुझी , त्या भावना,
सदैव मनात असूदे .
प्रीत माझी शोधते तू कुठे ,
मन ते बेचैन होते .
वाट आयुष्याची बिकट ,
तरीही मी चालते .
सहवास जरी अल्पसा ,
मिळाला मजला .
कोंदणात मनाच्या तो ,
कायमच वसला .
✍ कवयीत्री ✍
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर , 416106
No comments:
Post a Comment