बालकाव्य स्पर्धेसाठी
विषय - पाऊस
आला आला पाऊस आला,
आनंदाने नाचू गाऊ चला.
पिंकी,चिंकी,बबली सारे या रे,
पावसात सगळे भिजू या रे.
धडाडधुम धडाडधुम गरजले,
ढग एकमेकांवर आपटले.
लख लख विजा चमकल्या ,
लहान मुली साऱ्या घाबरल्या.
पाऊसधारा पडती खाली,
जमीन झाली ओली ओली.
पाण्याचे साचले मोठे तळे,
पाहून पोटात आले गोळे.
चिखलाचा राडा सगळीकडे,
पळाली पोरे अंगणाकडे.
नावा केल्या कागदाच्या,
मधेच सोडल्या डबक्याच्या
पाहता पाण्यात तरंगताना,
लहान नाव पोहताना.
एकच गिल्ला पोरासोरांचा,
घेतला आनंद पावसाचा.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment