बालकाव्य
गोगलगाय
लांबुळकी दोन शिंगांची ,
हळूहळू सरकते पुढेपुढे.
लागते हाताला बुळबुळीत,
भिंतीवर सावकाश चढे.
जातेस निवांतपणे सर्वत्र,
अंदाज घेत सावधपणे.
काय सोडतेस पाठीमागे?
चमकदार रेषा नियमितपणे.
पाठीवर असते शंख कधी,
कुठुन आणतेस सांग बाई?
गवतात का मातीत राहतेस ?
असते कुठे तुझी आई ?
कधी येतेस कधी जातेस,
कळतच नाही तुझं जगणं.
अल्पायुषी असलीस तरी,
सोडत नाहीस सरपटणं.
गोगलगायीची चाल म्हणून,
संथगतीला लोकं हिणवती.
पण सतत चालून चालून,
नक्कीच योग्य जागी पोहचती
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment