स्पर्धेसाठी
कविता
विषय- चिऊताई चिऊताई
चिऊताई
रोज येत होती माझ्या अंगनी,
चिऊताई छोट्या छोट्या सुंदर
पाहून मन माझे हरखून जाई,
आनंदाने नाचे लागू मनमंदिर.
जोडीजोडीने यायच्या दररोज
लोळायच्या मातीत मनसोक्त.
डबके पाण्याचे होते न्हाणीघर
आमच्या घरावर साऱ्या आसक्त.
काळ बदलला, घरे बदलली,
वासे स्थान चिमण्यांचे खास.
शोधून सापडेनात झाडे वेली,
जीवनाचा त्यांना लागला ध्यास
बांधून अधांतरी आता कुठेही
जगतोय आम्ही आगतीकपणे
करुन विनंती दमली चिऊताई
समजून घ्या तिला मानवतेने.
चिऊकाऊची गोष्ट नष्ट होत आहे
पुढच्या पिढीसाठी जतन करुया
पाणी, धान्य ठेवू घराबाहेर
चिमणीला घरी बोलवूया
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड,जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment