स्पर्धेसाठी
कविता
विषय-- पानगळ
पिकलं पान गळणारचं असतं
झाडाला सोडून जाणार असतं
कीती केले प्रेम तरी एकदा,
सोडून सर्वांना जायच असतं
सुखानंतर दु:ख चक्र चालतच असतं
गोलाकार, गरगर फीरतचं असतं
सुखात हुरळून जायचं नसतं
दु:खात नाराज व्हायचं नसतं
पान हिरवे प्रतिक तारुण्याचे
पान पिवळे आहे वार्धक्याचे
हिरवे पान घट्ट पकडे फांदीला
पिवळे पान धन धरतीचे
शरद ऋतुचा सांगावा घेऊन
देती जागा नवपालवीला
नवजीवनाची करुन सुरवात
सज्ज वसंताच्या स्वागताला
झाडे ओकीबोकी झाली
नवसंजीवनीच्या प्रेमाने
बहर फुलले पानोपानी
भास्कराच्या साक्षिने
कवयित्री ©️®️
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment