कविता
कोप निसर्गाचा
जातपात विसरून जनता ,
कामास की हो लागली.
नाही काही आड आले,
सारी मदतीसाठी धावली.
भेद सारे मावळून गेले,
वैरत्व कुठेच नाही दिसले.
भेदभाव सारा गळून गेला,
सर्वत्र बंधुत्वच अनुभवले.
पाण्याच्या महापूरात ,
माणुसकी जागी झाली.
आता कळेल जनतेला,
जातियतेची ठिणगी कुणी पेटवली
संकटे येतात शिकवायला,
खरा माणूस ओळखायला.
दोस्त का शत्रू समजवायला,
खरे जीवन दाखवायला.
पाण्याबरोबर वाहून गेला,
अहंभाव अन् दंभ मानवाचा.
आगतिक मानव निसर्गापुढे,
रोष पाहून पर्यावरणाचा.
मारल्या बाता विज्ञानाच्या,
हतबलता दिसून आली.
निसर्गमातेच्या कोपापुढे,
सारी नतमस्तक झाली.
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment