उपक्रम
कविता
उसासा
अवकाळी पावसाचा मारा,
अवचितच धरणीवरती आला.
पाहता पाहता सभोवतालचा,
सर्व भाग पाण्याखाली आला.
नव्हता वेळ कुणाकडेही,
टाकण्याला उसासा क्षणाचा.
श्वास दबले हुंदक्यातच,
ठाव उडाला मनाचा.
वाहिला संसार पाण्यात,
घरदार धारेला लागले.
झाली वाताहत कुटुंबाची,
मन चडफडू लागले.
टाकून उसासा दु:खाचा,
जनसागर हताश झाला.
शून्यातून संसार कसा उभारु,
एकमेकांना विचारु लागला.
सगळे एकाच नावेतील प्रवासी
आता उसासाच आहे सोबती.
समजून परदु:ख आपलेच,
एकमेकां सहाय्य करती.
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, ता.शिरोळ
जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment