स्पर्धेसाठी
मुक्तछंदातील कविता
विषय- जखमा हृदयाच्या
खोल गेल्या दु:ख देत
जखमा आज हृदयाच्या
निसर्गाच्या अवकृपेची
पाहिली मी दर्दभरी कहाणी
कोठून कशा आल्या धारा पावसाच्या..
लोंढा पाण्याचा काळ बणून आला भरवस्तीत.
हाहाकार माजला सगळीकडे
जनता हवालदिल झाली.
अशी कशी निसर्गाची अवकृपा झाली.
बरसला मेघराजा वेड्यासारखा,
सैरावैरा धावला मानव भेदरलेल्या कोकरासारखा.
आली कृष्णामाई धावत, प्रत्येकाला घेत कवेत.
गेले घरदार पाण्याखाली
संसार सारा वाहून गेला.
डोळ्यादेखत जनावरांना,
बुडताना पाहून जीव गेला.
छीन्नविछीन्न हृदय झाले,
भावनांचा सुटला बांध.
जखमा हृदयाच्या भरतील का ?....आता.
कोण आहे आमचा त्राता ?
निसर्गाची करणी का चूक मानवाची ?
विचार कर मानवा ,वागणे बदल,
आतातरी निसर्ग रक्षणासाठी पावले ऊचल.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment