काव्यस्पर्धेसाठी
विषय -- थैमान पुराचे
संततधार पावसाने घातले,
सगळीकडेच थैमान पुराचे.
हाहाकार माजला धरणीवरी,
पाहून रौद्ररूप पावसाचे.
कल्पनेच्या पलीकडले सारे,
अंदाज साऱ्यांचाच चुकला.
नाही नाही म्हणता मानवाचा,
संसारच पाण्यात बुडाला.
नदी,ओढे,नाले,भरले दुथडी,
रस्तेही गायब पाण्याखाली.
बघता बघता घरेदारे गेली,
क्षणात सारी वाताहत झाली.
मिळाली जलसमाधी येथे,
कितीक निरपराध्यांना.
आईच्या कुशीतले पाहून बालक
पाझरच फुटला पत्थरांना.
तोडून बंधन जातीपातीचे,
मानव धावला मदतीला.
माणूसकीचे दर्शन झाले,
तोड नाही इथल्या एकीला.
कवयित्री ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
9881862530
No comments:
Post a Comment