उपक्रम
सरींनो घ्यावी आता विश्रांती
आहे आकाश भरलेले गच्च
जमीनीवर सर्वत्र ओले कीच्च
पाट पाण्याचे अलोट वाहती
जाताना बरोबर संसारही नेती
गल्लीबोळातून नदी पळते आहे
ओलाव्यातचं आग पेटली आहे
आवडत्या सरी नावडत्या झाल्या
धारा अश्रूंच्या डोळ्यातून वाहिल्या
कौतुक चार दिवसांतच संपले
जनजीवन विस्कळीत झाले
सरींनो घ्यावी आता विश्रांती
बोल हे आले विचाराअंती
नको असा कोपू हे मेघराजा
कीती झाला तुझा गाजावाजा
विनंती हात जोडून करती सारे
आलास तसा मेघा आता जारे
रचना ©®
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment