स्पर्धेसाठी
विषय -- वार्धक्य
असावी मनाची उभारी ,
चेतवण्या दुस-यांची मने .
जरी आले वार्धक्य तरी ,
नसावे मनाचे अंगण सुने .
ठरलो येथे निप्रभ जर ,
विचारणार नाही येथे कुणी.
स्थान आपले टिकवण्यास ,
आत्मविश्वास असावा मनी.
अडगळ वाटे सगळ्यांना ,
उपदेशाचे डोस नको .
थरथरत्या हातांचा आता ,
आशिर्वाद ही झालाय नको.
संस्कारच आपले भोगतोय,
पडायला नको कुठे कमी .
आपण सांभाळू आईबाबांना युक्ती अनुकरणाची ही नामी
तब्येत आपली सांभाळू ,
मोकळ्या हवेत रोज फीरु.
कसरत करुन कसदारपणे,
आरोग्याची कास धरु .
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता.शिरोळ ,
जि.कोल्हापूर.
No comments:
Post a Comment