स्पर्धेसाठी
द्रोणकाव्य
विषय- श्रावणधारा
श्रावणधारा आल्या
बरसल्या अशा
भिजून गेल्या
पोरीबाळी
हासल्या
गोड
त्या
झेपावल्या जोरात
धरणीवरती
खूप वेगात
सरसर
तालात
सरी
त्या
चराचर भिजले
पालवी फुटली
आनंदी झाले
सर्वजण
नाचले
धरी
या
मांदियाळी सणांची
उत्साह भरला
जोड मनांची
आज झाली
खाण्याची
मौज
हो
उन्हाची पावसाची
लपाछपी चाले
मोरपीसाची
रोज दिसे
रंगाची
छटा
ही
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment