कविता
मोबाईल
आला जमाना मोबाईलचा,
नांदी ऑनलाइन शिक्षणाची.
अशी पसरली एक महामारी,
झाली दारे बंद विद्यालयाची.
आप्तस्वकीय दूरदेशी गेले,
आसुसला जीव भेटण्याला.
हाती मोबाईल काय आला,
समोर उभा आप्त बोलण्याला.
कार्यालयीन कामकाजासाठी,
आला धावून सखा मोबाईल.
मांडले विचार वेबिनार झाली,
शंका साऱ्या निघून जातील.
नको तार ना टपाल पाठवायला,
मोबाईल आहे उभा दिमतीला.
निरोप कळतो तत्परतेने,
असो मित्र लांब दूरदेशीला.
जेवढा उपयोगी तेवढा घातक,
ठरवायला हवी पद्धत वापरायची.
म्हटलं तर आबादी नाहीतर बरबादी.
योग्य रीत आपणच ठरवायची.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर
No comments:
Post a Comment