बालकाव्य लेखन स्पर्धेसाठी
विषय- मी कोण
मी तर मनू आईबाबांची ,
लाड लाडुली भावांची .
मन्या माझ्या मैत्रीणींची,
माणिक सर्व नातेवाईकांची .
खेळ खेळले सर्व मैदानी ,
गोट्यांचा डाव अंगणी.
गल्लीतील खेळ चिन्नी दांडूचा ,
पाठशिवणीचा खेळ प्रांगणी.
शिकले सायकल पडतखडत,
सतरा जखमा हातापायावर.
नाही तमा , दु:ख वाटे कधी,
शिवाशिवीचा डाव मैदानावर.
बालवाडीतील पहिला दिवस,
रडून दंगा केला खूप खूप.
लागली सवय हळूहळू मग,
डब्यात शोभे चपाती तूप.
दंगामस्ती आरडाओरडा,
हा तर आमचा टाइमपास.
आठवते मज माझे बालपण,
स्मरणात राहतो खासम खास.
नवे खेळ, नवे दोस्त,मैत्रिणी,
रोज नवनव्या खेळ क्लूप्त्या.
भंडावून सोडावे सगळ्यांना,
चिंता कुणाला, कशाच्या होत्या?
रम्य ते बालपण ,त्या आठवणी,
मी व्रात्य, दंगेखोर, बंडखोर होते.
रमते मन माझे भूतकाळात,
आपसूकच मग ऊल्हसित होते.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर.
No comments:
Post a Comment