Sunday, 15 October 2017

वाचनाचे महत्व

लेखस्पर्धेसाठी

विष -- वाचनाचे महत्व

" वाचाल तर वाचाल " असे म्हटले जाते ते अगदी खरं आहे .वाचनाने आपल्याला खूप उपयुक्त अशी माहीती मिळते.वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते .जीवनात वावरताना काय चांगले काय वाईट हे समजते म्हणजेच मन विचारी बनते.आपण मोठ्या संकटाना सामोरे जातो , थोडक्यात सांगायचे तर आपण वाचतो , सुरक्षित राहतो.

   विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकाबरोबरच संदर्भ पुस्तकेही वाचली पाहीजेत जेणेकरुन त्या घटकाबद्दल पूर्ण माहीती मिळते. तो घटक व्यवस्थित समजतो. पेपर सोडवताना याचा फायदा होतो.

  भारताचे माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना वाचनाची आवड होती . त्यांचे वाचनही खुप झाल्यामुळे त्यांची वैचारिक प्रगल्भता प्रचंड होती .विचारात साधेपणा होता .त्यांनी लिखाणही भरपूर केले आहे.आपले विचार ईतरांपर्यत पोहचवले आहे.यामुळे शासनाने त्यांचा जन्मदिवस " वाचन प्रेरणा दिन " म्हणून साजरा करायचे ठरविले आहे , त्यानुसार विविध ठिकाणी हा दिन मोठ्या ऊत्साहात साजरा केला गेला.वाचनाचे , पुस्तकाचे महत्व सांगीतले गेले.वाचनाचे तास घेऊन वाचनप्रेरणा देण्यात आली.

वाचनाने मनातील मळभ दुर होते .मन प्रसन्न बनते. जेवढे वाचन करु तेवढं मन आनंदित होते . वाचनाने आपल्याला देशविदेशातील माहीती मिळते .

   म्हणून वाचतच राहीले पाहीजे व ज्ञानाचा प्रकाश घरोघरी पोहचवला पाहिजे .

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड ,ता शिरोळ ,
जि.कोल्हापूर .

No comments:

Post a Comment