Sunday, 15 October 2017

काव्यरुपी सुविचारांचे सुगंधी साबण

स्पर्धेसाठी

विषय -- काव्यरुपी सुविचारांचे सुगंधी साबण

        आनंदवन

आनंदवनी पोहचलो जेव्हा ,
अनुभूती वेगळी आली तेव्हा
सर्वधर्मसमभाव मानवताच दिसली,
आपुलकीची भावना मनात दाटली.

स्वावलंबन शिस्त ती भारी ,
स्वच्छता नांदतसे दारी .
हस्तकलेत निपुण सगळे ,
प्रत्येकाचे रुप आगळे .

कुणी कुणाचा मालक ना दास,
प्रत्येकाला कामाचाच ध्यास
झाडाफुलांचा निसर्ग खेळतो
श्रमसाफल्याचा हार माळतो

भूमी आगळी लोक वेगळे,
बिनहत्यारी सर्व मावळे .
कुणी न नेता ना सेनापती ,
आम्हीच हो ईथले नृपती .

प्रणाम करुनी मी नतमस्तक
आत्मभान देतसे दस्तक .
कोण आपण कुठली जनता
जपली जाते फक्त मानवता.

    कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530 .

No comments:

Post a Comment