स्पर्धेसाठी
विषय -- काव्यरुपी सुविचारांचे सुगंधी साबण
आनंदवन
आनंदवनी पोहचलो जेव्हा ,
अनुभूती वेगळी आली तेव्हा
सर्वधर्मसमभाव मानवताच दिसली,
आपुलकीची भावना मनात दाटली.
स्वावलंबन शिस्त ती भारी ,
स्वच्छता नांदतसे दारी .
हस्तकलेत निपुण सगळे ,
प्रत्येकाचे रुप आगळे .
कुणी कुणाचा मालक ना दास,
प्रत्येकाला कामाचाच ध्यास
झाडाफुलांचा निसर्ग खेळतो
श्रमसाफल्याचा हार माळतो
भूमी आगळी लोक वेगळे,
बिनहत्यारी सर्व मावळे .
कुणी न नेता ना सेनापती ,
आम्हीच हो ईथले नृपती .
प्रणाम करुनी मी नतमस्तक
आत्मभान देतसे दस्तक .
कोण आपण कुठली जनता
जपली जाते फक्त मानवता.
कवयित्री
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता.शिरोळ ,
जि. कोल्हापूर .
9881862530 .
No comments:
Post a Comment